शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा अंतिम निर्णयापर्यंत!

By admin | Updated: June 6, 2017 01:09 IST

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका पाहता त्यांना कर्जमुक्ती आवश्यक आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत तो संकटातून सावरल्या जाणार नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक असून, कर्जमाफी होईपर्यंत शिवसेनेचा लढा कायम राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते डॉ. सुभाष राठोड यांनी केले. ते मानोरा तालुक्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरणे कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी ५० हजार अर्ज शेतकऱ्यांचे भरल्या जाणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे.राज्यभर शिवसंपर्क अभियानाद्वारे शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. शिवसेनेच्यावतीने जिल्हा, तालुका स्तरावर तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुखांकडून जिल्हा परिषद सर्कलनिहाय अर्ज भरुन घेण्यास सुरुवात केली आहे. मानोरा तालुक्यात डॉ. सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेस सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवसेना तालुकाप्रमुख रवी पवार यांनी इंझोरी जिल्हा परिषद सर्कलमधील इंझोरी, मसणी, जामदरा, दापुरा बु., दापुरा खुर्द, चौसाळा, तोरनाळा, उमरदरी येथील शेतकऱ्यांचे अर्ज भरुन घेतले आहेत. यावेळी छोटेखानी कार्यक्रमात डॉ. सुभाष राठोड यांनी शिवसेना पक्ष सत्तेत असला, तरी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत असल्यामुळे सामाजिक जबाबदारीतून शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय तो सुखी होऊन शकत नसल्याचे म्हटले. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज भरून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याकरिता तालुक्यातील सर्वच शिवसैनिक प्रयत्नशील असल्याचे शहरप्रमुख राजु देशमुख, डॉ. श्याम जाधव, उपप्रमुख डॉ. करसडे यांनी कळविले आहे.--