शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

१५ दिवसांपासून शिरपूर येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

२०१२ पूर्वी गावात नादुरुस्त नळयोजनेमुळे पाणीटंचाई होती. गावकऱ्यांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात ...

२०१२ पूर्वी गावात नादुरुस्त नळयोजनेमुळे पाणीटंचाई होती. गावकऱ्यांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य इमदाद बागवान यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४.८९ मंजूर करून घेतले. मात्र, या योजनेचे काम नियमानुसार करण्यात आले नाही. पाइपलाइन जमिनीमध्ये योग्य त्या खोलीवर टाकण्यात आली नाही. परिणामी पाइपलाइन वारंवार लिकेज होत आहे. बागवान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांसह तक्रारीसुद्धा केल्या. अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले. यावर बागवान यांनी लोक न्यायालयात प्रकरण नेले; परंतु अपेक्षित न्याय मिळू शकला नाही. परिणामी शिरपूर ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन वारंवार नादुरुस्त होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद आहे. लिकेज झालेली पाइपलाइन दुरुस्ती करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

........

राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम हे नियमानुसार न झाल्याने पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन कुठे ना कुठे सतत नादुरुस्त होत आहे. यामुळे गावकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकत नाही. याला वरिष्ठ स्तरावरील अधिकारी जबाबदार आहेत.

- इमदाद बागवान,

माजी जिल्हा परिषद सदस्य,

शिरपूर जैन

शिरपूर ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन प्रकल्पानजीकच एका मोठ्या नाल्यात नादुरुस्त झाली आहे. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मोठे प्रयत्न करूनही पाइपलाइन दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. याविषयी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.

- भागवत भुरकाडे,

ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत, शिरपूर