शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

शिरपूर जैन : हायड्रोकार्बन तपासणीचा फटका शेतकर्‍यांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:06 IST

देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्‍यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि इतर साहित्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसानभरपाईपोटी दिला जातोय नगण्य मोबदला 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्‍यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि इतर साहित्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीसाठी प्रशासनाकडून मोबदला दिला जात असला तरी, तो अतिशय नगण्य असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे.  देशातील गाळयुक्त खोर्‍यात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्यासाठी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. या साठी अल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सूचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांकडून सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठय़ांना संबंधित संस्थेला त्यांनी निश्‍चित केलेल्या जागेवर सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रक्रियेला मालेगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे. गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत हरभरा, गहू ही पिके असलेल्या शेतातून खोदकामाचे साहित्य आणि वाहने नेण्यात येत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला दिला जात असला तरी, झालेल्या नुकसानाच्या तुलनेत तो खूप कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत मिर्झापूर, पांगरखेडा शिवारात हे काम सुरू असून, नुकसानापोटी मिळालेल्या तुटपुंज्या मोबदल्याची माहिती शेतकर्‍यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनाही दिली आहे. 

हायड्रोकार्बन साठय़ाच्या तपासणीसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि खोदकामाचे साहित्य शेतातून फिरविण्यात येत आहे. त्यामुळे तूर, हरभरा, गहू या पिकांचे मोठे नुकसान होत असून, या नुकसानापोटी मिळणारा मोबदला नगण्य आहे. नुकसानाचे प्रमाण लक्षात घेऊनच प्रशासनाने शेतकर्‍यांना मोबदला द्यावा.                                                       -अर्जुना सोमटकर,  शेतकरी, मिर्झापूर

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती