शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

शिरपूर जैन : हायड्रोकार्बन तपासणीचा फटका शेतकर्‍यांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:06 IST

देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्‍यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि इतर साहित्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसानभरपाईपोटी दिला जातोय नगण्य मोबदला 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्‍यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि इतर साहित्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीसाठी प्रशासनाकडून मोबदला दिला जात असला तरी, तो अतिशय नगण्य असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे.  देशातील गाळयुक्त खोर्‍यात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्यासाठी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. या साठी अल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सूचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांकडून सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठय़ांना संबंधित संस्थेला त्यांनी निश्‍चित केलेल्या जागेवर सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रक्रियेला मालेगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे. गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत हरभरा, गहू ही पिके असलेल्या शेतातून खोदकामाचे साहित्य आणि वाहने नेण्यात येत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला दिला जात असला तरी, झालेल्या नुकसानाच्या तुलनेत तो खूप कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत मिर्झापूर, पांगरखेडा शिवारात हे काम सुरू असून, नुकसानापोटी मिळालेल्या तुटपुंज्या मोबदल्याची माहिती शेतकर्‍यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनाही दिली आहे. 

हायड्रोकार्बन साठय़ाच्या तपासणीसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि खोदकामाचे साहित्य शेतातून फिरविण्यात येत आहे. त्यामुळे तूर, हरभरा, गहू या पिकांचे मोठे नुकसान होत असून, या नुकसानापोटी मिळणारा मोबदला नगण्य आहे. नुकसानाचे प्रमाण लक्षात घेऊनच प्रशासनाने शेतकर्‍यांना मोबदला द्यावा.                                                       -अर्जुना सोमटकर,  शेतकरी, मिर्झापूर

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती