शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आघाडी सरकारच्या राजवटीत घोटाळय़ांची मालिकाच!

By admin | Updated: October 13, 2014 00:54 IST

वाशिम जिल्ह्यातील जाहीर सभेत अमित शहा यांची टीका.

कारंजा लाड (वाशिम): राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने १५ वर्षांच्या राजवटीत घोटाळय़ांशिवाय काहीच केले नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथील जाहीर सभेत केली. महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रचारसभा रविवारी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यात आजवर ३५ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आघाडी सरकारने मात्र सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा असे विविध घोटाळे करून ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. काँग्रेसने शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर केले; परंतु पॅकेजचे पैसे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेच नाही. सुजलाम, सुफलाम महाराष्ट्र आघाडी सरकारने कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न करून, भाजपशासित राज्यांमध्ये चांगला विकास झाल्याचा दावा शहा यांनी केला.नरेंद्र मोदींच्या रूपाने भाजपने सर्वप्रथम देशाला बोलणारा पंतप्रधान दिला. त्यांच्या वकृत्व शैलीने सं पूर्ण जग भारावले, असे शहा यांनी सांगितले. गत ६0 वर्षांत देशातील ५0 टक्के नागरिकांचे बँकेत खातेच उघडले नाही. भाजपने जनधन योजना जाहीर केली आणि या योजनेंतर्गत देशातील पाच कोटी नागरिकांनी बँकेत खाते उघडले. त्यामुळे १ लाखांचे विमा संरक्षण त्यांना मिळाले. देशाचा विकास दर ८.४ टक्के असताना काँग्रेस सरकार सत्तेवर आले. १0 वर्षांच्या काळात हा दर ४.२ टक् क्यांपर्यंत घसरला. भाजपने हा दर तीन महिन्यातच ५.७ टक्क्यांवर नेला, असे शहा यांनी सांगितले. सीमेवर पाकिस्तानकडून होणार्‍या गोळीबाराबाबत काँग्रेसकडून केल्या जाणार्‍या आरोपांचा शहा यांनी समाचार घेतला. पूर्वी पाकिस्तानी सैनिक गोळीबार सुरू करायचे आणि थांबवायचेही तेच. आ ता चित्र बदलले आहे. गोळीबार आताही सुरू त्यांच्याकडूनच होतो; परंतु तो थांबवतात भारतीय सैनिक, असा टोला त्यांनी लगावला. मोदींनी मेक इन इंडिया हा मंत्र देऊन, विदेशी कंपन्यांना बाजारपेठ मोकळी करून दिली; परंतु या देशात उत्पादने विकायची असतील, तर ती येथेच तयार करावी, असे आवाहन केल्यानंतर देशात ३ हजार कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखविली. पंतप्रधानांनी बेटी बचाव, स्वच्छ ता अभियान, आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केल्याचे स्पष्ट करून, मोदी सरकारने चार महिन्यात काय केले, हे सांगण्यासाठी भागवत सप्ताह आयोजित केला तरी, ते सांगता येणार नाही, असेही शहा म्हणाले.