शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पपईची मातीमोल भावात विक्री

By admin | Updated: March 20, 2015 00:56 IST

३ रूपये किलोनेही ग्राहक येईना; मंगरूळपीर तालुक्यातील फळउत्पादक शेतकरी त्रस्त.

मंगरूळपीर (जि. वाशिम): उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे व नुकत्याच झालेल्या गारपीटमुळे पपईचे दर १२ रूपयावरून प्रति किलो ३ रूपये पर्यंंत आल्याने तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पपई लागवडीसाठी जिल्हय़ात मंगरूळपीर तालुका आघाडीवर आहे.या तालुक्यातील शेतकर्‍यांनी अनेक प्रकारचे प्रयोग आपल्या शेतात करून यशस्वी झाले आहे. परंतु मागील एक दोन वर्षांंपासुन निर्सगाच्या अवकृपेमुळे फळ उत्पादक बळीराजा अस्मानी संकटात सापडुन कर्जबजारी होत आहे. तालुक्यात जवळपास सर्वच प्रकारच्या फळबागा आहेत.उन्हाळय़ात फळबागाचा फायदा होईल या आशेने पपई, खरबुज, टरबुज लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना वादळी पाऊस व गारपीटचा जबर फटका बसला आहे. शिवाय पंधरा दिवसांपासुन बदलेल्या वातावरणामुळे फळाची मागणी कमी झाली व्यापारी सुध्दा दिसेनासे झाले आहेत त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत. अचानक उत्तर भारतात गारवा निर्माण झाल्याने उन्हाळी फळांची मागणीत घट झाली असल्याने पपईच्या बागेत फळे पिकुन खाली पडत आहे. परिणामी शेतकर्‍यांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. निर्सगाच्या मार्‍याला हैराण झालेल्या बळीराजाना आधार देण्यासाठी शासनाने पुढे यावे अशी मागणी फळ उत्पादक शेतकरी करित आहे.