शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंशिस्त पाळणे हा सद्य:स्थितीतील प्रभावी उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:40 IST

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, खासगी डॉक्टर्स, पोलीस, नगरपालिका यासह सर्व सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न ...

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, खासगी डॉक्टर्स, पोलीस, नगरपालिका यासह सर्व सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. सरकारने नागरिकांच्या फायद्यासाठी कोरोनाविषयक नियम लागू केले आहेत. त्याचे पालन करून सर्वांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास हातभार लावला तर निश्चितच आपण कोरोनावर मात करू. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे हा सद्य:स्थितीतील प्रभावी उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तू महत्त्वाच्या आहेत; पण त्यापेक्षाही जीवन आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून येताच, तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी व उपचार घ्यावे. कोरोना चाचणी करण्यास विलंब करू नये. तसेच लक्षणे दिसून येताच इतरांच्या संपर्कात येऊ नये. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ शकणार नाही. तसेच गृह विलगीकरणात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. चार ते पाच दिवसांनंतर आपल्याला कुठलाच त्रास होत नाही, असे जाणवल्यावरही घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यातून मोठ्या प्रमाणावर संक्रमण पसरत असल्याची भीती आहे. अशी एक व्यक्ती किमान ५० ते ६० जणांना बाधित करू शकते. त्यामुळे होम क्वारंटाइनमध्ये असलेल्यांवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे झाले आहे.