शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

स्वयंशिस्त पाळणे हा सद्य:स्थितीतील प्रभावी उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:40 IST

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, खासगी डॉक्टर्स, पोलीस, नगरपालिका यासह सर्व सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न ...

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, खासगी डॉक्टर्स, पोलीस, नगरपालिका यासह सर्व सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. सरकारने नागरिकांच्या फायद्यासाठी कोरोनाविषयक नियम लागू केले आहेत. त्याचे पालन करून सर्वांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास हातभार लावला तर निश्चितच आपण कोरोनावर मात करू. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे हा सद्य:स्थितीतील प्रभावी उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तू महत्त्वाच्या आहेत; पण त्यापेक्षाही जीवन आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून येताच, तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी व उपचार घ्यावे. कोरोना चाचणी करण्यास विलंब करू नये. तसेच लक्षणे दिसून येताच इतरांच्या संपर्कात येऊ नये. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ शकणार नाही. तसेच गृह विलगीकरणात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. चार ते पाच दिवसांनंतर आपल्याला कुठलाच त्रास होत नाही, असे जाणवल्यावरही घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यातून मोठ्या प्रमाणावर संक्रमण पसरत असल्याची भीती आहे. अशी एक व्यक्ती किमान ५० ते ६० जणांना बाधित करू शकते. त्यामुळे होम क्वारंटाइनमध्ये असलेल्यांवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे झाले आहे.