शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

बियाणे उगवलेच नाही; तक्रारींबाबत शेतकरी मात्र उदासीन

By admin | Updated: December 3, 2014 01:41 IST

वाशिम जिल्हय़ात केवळ १0 शेतक-यांच्या तक्रारी.

नंदकिशोर नारे /वाशिमखरीप पिकाने दगा दिल्यानंतर केलेला खर्चही हाती न आल्याने शेतकरी हवालदिल झाला. पेरलेले बियाणे उगवले नाही, यासाठी ज्या कंपनीचे बियाणे उगवले नाही त्यांच्याविरोधात तक्रार करण्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागातील प्राप्त तक्रारीच्या आकडेवारीवरून दिसून येते.पेरलेले बियाणे न उगवल्यामुळे जिल्हय़ातील मानोरा तालुक्यातील एका, रिसोड तालुक्यातील ४ तर वाशिम तालुक्यातील ५ अशा जिल्हय़ातील १0 शेतकर्‍यांनी बियाणे कंपन्याविरूद्ध नुकसान भरपाईची मागणी केली होती. यामधील मानोरा तालुक्यातील एका शेतकर्‍याने तीन कंपन्यांविरूद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये कंपनीने तक्रारकर्त्या शेतकर्‍याला नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते; मात्र ते देत असलेली नुकसान भरपाई सदर शेतकर्‍याला पटली नसल्याने ते अमान्य केली होती; तसेच वाशिम तालुक्यातील ५ शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारींपेैकी एका शेतकर्‍याला बियाणे कंपनीने नुकसान भरपाई दिल्यामुळे त्यांनी तक्रार मागे घेतली होती.यावर्षी अनेक कंपनीचे बियाणे उगविले नाही म्हणून व पावसाने दगा दिल्याने शेतकर्‍यांना अनेक ठिकाणी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पावसामुळे पिके न आल्याने शेतकर्‍यांना मदत मिळणे अपेक्षित होते; मात्र यापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. बियाणे उगविले नाही ही नैसर्गिक आपत्ती होऊ शकत नाही म्हणून याबाबत कोणत्याच प्रकारची मदतीची उपाय योजना कृषी विभागाकडून राबविण्यात आली नाही. त्यांनी शेतकर्‍यांच्या तक्रारी घेऊन संबंधित बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात ३ हजार ६५0 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत १ हजार ५११ शेतकर्‍यांनी तक्रारी केल्यात, त्यामध्ये वाशिम जिल्हय़ातील केवळ १0 तक्रारींचा समावेश आहे.