शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यातील कामगारांचे लोंढे परप्रांताकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:47 IST

रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याचे दिसते; परंतु विविध नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला. रब्बीतही भारनियमनाचा खोडा असल्याने शेतीची कामे मिळेनासी झाली, तर रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात रोजगाराचा सर्वात मुख्य मार्ग हा शेतीवर आधारित आहे. उद्योग धंद्यांचा अभाव, विकासाची संथगती आदिंमुळे इतर कामांची उपलब्धताही नाही. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने खरीप हंगामावरच शेतकरी आणि शेतमजुरांची भिस्त असते. जिल्ह्यात पावसाची अनियमितता नेहमीच पाहायला मिळते. त्यातच विविध नैसर्गिक संकटांचा परिणाम शेतीपिकांवर होतो. त्यामुळे उत्पादनात सातत्याने घट होत आहे. याचा परिणाम शेतीश्ी निगडित उद्योगधंद्यांवर होतो. त्यामुळेच खरीप हंगाम संपला की, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होतो. यंदाही ही स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप हंगामाला बसल्यानंतर रब्बी हंगामात भारनियमनाचा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीमधील कामे बंद पडली असून, शेतीवर अवलंबून असलेले कामगार रोजगारासाठी परप्रांतात धाव घेत आहेत. मानोरा तालुक्यातील अनेक गावे यामुळे निम्म्याहून अधिक रिकामी झाली असताना आता इतरही तालुक्यातील शेतमजूर कुटुंबासह परप्रांतात कामाच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोगलदरी परिसरातील शेकडो घरांना टाळेमंगरुळपीर तालुक्यात खरीप हंगाम संपल्यानंतर कामे मिळेनासी झाली असून, शेतीवर अवलंबून असलेले शेकडो शेतमजुरांनी रोजगारासाठी पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि गुजरात, मध्यप्रदेशासारख्या राज्यात स्थलांतर केले आहे. एकट्या जोगलदरी येथील ५० घरांना टाळे ठोकून कामगार मुलाबाळांसह परप्रांतात गेले आहेत, तर साळंबी, कोळंबी, दाभा, कवठळ, कोठारी, चेहेल आदि ठिकाणचे अनेक मजुर परप्रांतात घराला टाळे ठोकून गेले आहेत. प्रामुख्याने उसतोडणीच्या कामाची निवड कामगारांनी केल्याचे या संदर्भातील माहितीवरून कळले आहे.

टॅग्स :washimवाशिम