शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यातील कामगारांचे लोंढे परप्रांताकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:47 IST

रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याचे दिसते; परंतु विविध नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला. रब्बीतही भारनियमनाचा खोडा असल्याने शेतीची कामे मिळेनासी झाली, तर रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात रोजगाराचा सर्वात मुख्य मार्ग हा शेतीवर आधारित आहे. उद्योग धंद्यांचा अभाव, विकासाची संथगती आदिंमुळे इतर कामांची उपलब्धताही नाही. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने खरीप हंगामावरच शेतकरी आणि शेतमजुरांची भिस्त असते. जिल्ह्यात पावसाची अनियमितता नेहमीच पाहायला मिळते. त्यातच विविध नैसर्गिक संकटांचा परिणाम शेतीपिकांवर होतो. त्यामुळे उत्पादनात सातत्याने घट होत आहे. याचा परिणाम शेतीश्ी निगडित उद्योगधंद्यांवर होतो. त्यामुळेच खरीप हंगाम संपला की, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होतो. यंदाही ही स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप हंगामाला बसल्यानंतर रब्बी हंगामात भारनियमनाचा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीमधील कामे बंद पडली असून, शेतीवर अवलंबून असलेले कामगार रोजगारासाठी परप्रांतात धाव घेत आहेत. मानोरा तालुक्यातील अनेक गावे यामुळे निम्म्याहून अधिक रिकामी झाली असताना आता इतरही तालुक्यातील शेतमजूर कुटुंबासह परप्रांतात कामाच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोगलदरी परिसरातील शेकडो घरांना टाळेमंगरुळपीर तालुक्यात खरीप हंगाम संपल्यानंतर कामे मिळेनासी झाली असून, शेतीवर अवलंबून असलेले शेकडो शेतमजुरांनी रोजगारासाठी पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि गुजरात, मध्यप्रदेशासारख्या राज्यात स्थलांतर केले आहे. एकट्या जोगलदरी येथील ५० घरांना टाळे ठोकून कामगार मुलाबाळांसह परप्रांतात गेले आहेत, तर साळंबी, कोळंबी, दाभा, कवठळ, कोठारी, चेहेल आदि ठिकाणचे अनेक मजुर परप्रांतात घराला टाळे ठोकून गेले आहेत. प्रामुख्याने उसतोडणीच्या कामाची निवड कामगारांनी केल्याचे या संदर्भातील माहितीवरून कळले आहे.

टॅग्स :washimवाशिम