शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’च्या कामांचे शास्त्रशुद्ध आराखडे होणार तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी शेतीमालाच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येक शेताला सिंचनासाठी पाणी मिळणे ...

वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी शेतीमालाच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येक शेताला सिंचनासाठी पाणी मिळणे गरजेचे असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करावयाच्या कामांचा गावनिहाय तंत्रशुद्ध आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुषंगाने प्रायोगिक तत्त्वावर मालेगाव तालुक्यातील ७ गावांची निवड करण्यात आली आहे.

देशभरातील १११ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्यासाठी शेतातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘मनरेगा’अंतर्गत जलसंधारणाची कामे करून, गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब गावातच जिरविण्याचे नियोजन करणे, गावनिहाय ‘जीएसआय’ आधारित आराखडा तयार करणे, पहिल्या टप्प्यात ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’अंतर्गत निवड केलेल्या मानोरा व मालेगाव तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण करून आराखडे तयार करण्यासोबतच जिल्ह्यात फळबाग लागवड, शेतमालासाठी गोडावून उभारणीच्या कामांवर विशेष भर दिला जात आहे.

............

आराखडा तयार करण्यासंबंधी ग्रामसभांद्वारे मार्गदर्शन

तिवळी, गांगलवाडी, कुत्तरडोह, ढोरखेडा, बोराळा जहागीर, खैरखेडा आणि कोलदरा या सात गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येत आहे. त्यात गाव परिसरात ‘रोहयो’अंतर्गत करावयाच्या कामांचा शास्त्रशुद्ध आराखडा तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

...............

कुत्तरडोहला मुख्य सचिवांची भेट

मालेगाव तालुक्यातील कुत्तरडोह या गावाला मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘रोहयो’अंतर्गत करावयाच्या कामांचा शास्त्रशुद्ध आराखडा तयार करण्याबाबत कुठलीही अडचण जाणवल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.