शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शाळांतील वीजजोडणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:53 IST

वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्याप वीजपुरवठा पोहोचला नाही.अशा ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर याची इत्यंभूत माहिती महावितरणकडे दिली जाणार आहे.जास्त लोकसंख्येच्या गावातील जिल्हा परिषद शाळांवर लक्ष केंद्रीत करून येथे आवश्यक त्या मुलभुत भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.देशातील ११५ मागास जिल्ह्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सहयोगाने नीती आयोग ‘कन्वर्जन्स, इन्टग्रेशन अँड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट’ हा उपक्रम राबवित आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात निधी तरतूददेखील करण्यात आली आहे. पोषण, आरोग्य, शिक्षण, मुलभूत पायाभूत सुविधा, कृषी आणि जलसंधारण, आर्थिक समावेशकता आणि कौशल्य विकास या विषयाच्या अनुषंगाने मागास जिल्ह्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण, आरोग्य, मुलभूत पायाभूत सुविधा या विषयाला सर्वाधिक  प्राधान्य असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे चाचपणी केली जात आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्याप वीजपुरवठा पोहोचला नाही. त्यामुळे या ठिकाणी डिजिटल स्कूल ही संकल्पना राबविणे कठीण आहे. अशा ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर याची इत्यंभूत माहिती महावितरणकडे दिली जाणार आहे. अशा शाळांमध्ये वीजजोडणी देण्यासाठी आवश्यक तेथे विद्युत खांब उभारणी केली जाणार आहे. जास्त लोकसंख्येच्या गावातील जिल्हा परिषद शाळांवर लक्ष केंद्रीत करून येथे आवश्यक त्या मुलभुत भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर