शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याची शाळा प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

वाशिम : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला जबर फटका बसला असून, आता दहावी, बारावीच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत; पण तत्पूर्वीच शाळांना ...

वाशिम : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला जबर फटका बसला असून, आता दहावी, बारावीच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत; पण तत्पूर्वीच शाळांना वाटप केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सीलबंद उत्तरपत्रिका महिनाभर ‘कस्टडी’त सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे.

दहावी- बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे, जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, तारखेबाबत अद्याप निश्चितता नाही; परंतु आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले. अमरावती विभागीय मंडळानेही जिल्ह्यातील शाळांपर्यंत साहित्य पोहोचविले. मात्र, परीक्षा केंद्रांपर्यंत हे साहित्य पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख लांबल्याची घोषणा झाली. आता या साहित्याचे काय करावे, असा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे.

या साहित्यामध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका, आदींचा समावेश आहे. आता हे साहित्य केंद्र संचालकांनाच स्वत:च कस्टडीत जपून ठेवावे लागणार आहे.

०००००

परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागून

जिल्ह्यात बारावीचे १८ हजार १७५ आणि दहावीचे १९ हजार ७१५ विद्यार्थी आहेत. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्याच नाहीत. दोन महिन्यांचा अपवाद वगळता विद्यार्थ्यांना घरी राहूनच अभ्यास करावा लागला. ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने परीक्षेची तयारी केली. आता परीक्षेची तारीख लांबली असून, परीक्षा केव्हा होणार याबाबत स्पष्टता नाही. परीक्षेची तारीख जाहीर केव्हा होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

०००

दहावीतील विद्यार्थी- १९,७१५

बारावीतील विद्यार्थी- १८,१७५