शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याची शाळा प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

वाशिम : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला जबर फटका बसला असून, आता दहावी, बारावीच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत; पण तत्पूर्वीच शाळांना ...

वाशिम : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला जबर फटका बसला असून, आता दहावी, बारावीच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत; पण तत्पूर्वीच शाळांना वाटप केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सीलबंद उत्तरपत्रिका महिनाभर ‘कस्टडी’त सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे.

दहावी- बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे, जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, तारखेबाबत अद्याप निश्चितता नाही; परंतु आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले. अमरावती विभागीय मंडळानेही जिल्ह्यातील शाळांपर्यंत साहित्य पोहोचविले. मात्र, परीक्षा केंद्रांपर्यंत हे साहित्य पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख लांबल्याची घोषणा झाली. आता या साहित्याचे काय करावे, असा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे.

या साहित्यामध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका, आदींचा समावेश आहे. आता हे साहित्य केंद्र संचालकांनाच स्वत:च कस्टडीत जपून ठेवावे लागणार आहे.

०००००

परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागून

जिल्ह्यात बारावीचे १८ हजार १७५ आणि दहावीचे १९ हजार ७१५ विद्यार्थी आहेत. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्याच नाहीत. दोन महिन्यांचा अपवाद वगळता विद्यार्थ्यांना घरी राहूनच अभ्यास करावा लागला. ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने परीक्षेची तयारी केली. आता परीक्षेची तारीख लांबली असून, परीक्षा केव्हा होणार याबाबत स्पष्टता नाही. परीक्षेची तारीख जाहीर केव्हा होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

०००

दहावीतील विद्यार्थी- १९,७१५

बारावीतील विद्यार्थी- १८,१७५