शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

माजी सैनिकांच्या पाल्यांनाही मिळणार शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:15 IST

पात्र विद्यार्थ्यांकडून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने १५ आॅक्टोबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१९-२० मध्ये इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण प्राप्त करून पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने १५ आॅक्टोबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत.देशरक्षणार्थ सेवा देणाºया माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण भासू नये, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून सैनिक कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता दहावी, बारावीमध्ये ६० टक्के गुण प्राप्त केले आहेत, त्यांना १५ आॅक्टोंबर २०२० पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वाशिम येथे कागदपत्रासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. इयत्ता दहावी, बारावी, पदविका व पदवी परिक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, केंद्र व राज्य शासनाची इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा महाविद्यालयाचा, संस्थेच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीची मंजूरी घ्यावी लागणार आहे. माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची व रेशनकार्डची साक्षांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती