शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सहस्त्र सिंचन विहीर योजना ठरतेय ‘मृगजळ’!

By admin | Updated: March 7, 2017 02:45 IST

उद्दिष्ट सहा हजार विहिरींचे; दोन महिन्यात केवळ १२ विहिरींच्या कामांना प्रारंभ.

वाशिम, दि. ६- जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे, या मूळ उद्देशाने शासन स्तरावरून पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजना हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ३0 जून २0१७ पर्यंत तब्बल सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करावयाची आहेत; मात्र गत दोन महिन्यांच्या काळात त्यापैकी केवळ १२ विहिरींच्या कामांना प्रारंभ झाल्याची माहिती सूत्रांकडून सोमवारी प्राप्त झाली.पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत २४ डिसेंबर २0१६ पर्यंत अर्ज स्वीकारून १0 जानेवारी २0१७ पर्यंत सर्वेक्षण करण्यासह १५ जानेवारीपर्यंत या विहिरींना ग्रामसभेत मान्यता मिळवून घेणे अपेक्षित होते; परंतु या प्रक्रियेतच मोठा कालावधी निघून गेला. सद्य:स्थितीत जिल्ह्यात या योजनेसाठी शेतकर्‍यांकडून १८ हजार ४४५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील ६ हजार ८६५ अर्ज पात्र ठरले आहेत. यासाठी सहा तालुक्यांत मिळून ३९0 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या आहेत. या योजनेंतर्गत वाशिम तालुक्यात शनिवार, ४ मार्चपर्यंत १0 विहिरींची कामे सुरू झाली; तर मानोरा तालुक्यात पात्र ठरलेल्या ४१७ अर्जांपैकी केवळ २ विहिरींची कामे सुरू होऊ शकली आहेत. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही काही ठिकाणी अद्याप ग्रामसभांचे आयोजनच करण्यात आलेले नाही. आता या योजनेसाठी प्रशासनाला राहिलेल्या ग्रामपंचायतीत ग्रामसभांचे आयोजन करण्यासह निर्धारित उद्दिष्टातील लाभार्थींची निवड करण्यासाठी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून योजना यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असताना तालुका पातळीवरून मात्र अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजनेचे उद्दिष्ट उर्वरित चार महिन्यांत पूर्ण करणे कठीण असल्याचे दिसत आहे.पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्यातील वाशिम आणि मानोरा तालुक्यात १२ विहिरींच्या कामांना प्रारंभ झाला आहे. या योजनेसाठी प्राप्त अर्जातील बहुतांश अर्जांना मान्यता देण्यात आली असून, उर्वरित विहिरींनाही लवकरच सुरूवात केली जाईल. - सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम