शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana Wedding Postponed : स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली! लग्न पुढे ढकलले
2
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
3
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
4
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
5
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
6
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
7
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
8
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
9
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
10
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
11
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
12
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
13
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
14
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
15
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
16
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
17
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
18
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
19
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
20
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण जनतेचा नवख्या चेहर्‍यांना कौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:09 IST

वाशिम: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यात विजयी होणार्‍या उमेदवारांनी आपल्या सर्मथकांसह जल्लोष साजरा केला. दरम्यान, सार्वत्रिक निकालावरून ग्रामीण जनतेने त्याच त्या चेहर्‍यांना डावलत बहुतांशी नवख्या चेहर्‍यांना कौल देत परिवर्तन घडविल्याचे पाहावयास मिळाले. यंदा प्रथमच सरपंचपाची निवड थेट जनतेतून झाल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. 

ठळक मुद्दे२७३ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीरगुलालांची उधळण करत विजयी उमेदवारांचा सर्मथकांसह जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यात विजयी होणार्‍या उमेदवारांनी आपल्या सर्मथकांसह जल्लोष साजरा केला. दरम्यान, सार्वत्रिक निकालावरून ग्रामीण जनतेने त्याच त्या चेहर्‍यांना डावलत बहुतांशी नवख्या चेहर्‍यांना कौल देत परिवर्तन घडविल्याचे पाहावयास मिळाले. यंदा प्रथमच सरपंचपाची निवड थेट जनतेतून झाल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. २७३ पैकी निवडणुकीपूर्वीच १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ७  ऑक्टोबर रोजी जिल्हय़ातील सहाही तालुक्यांमधील २६१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. मतदानानंतर गावागावात राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पॅनल लढविणारे नेते व गावातील काही नागरिक कोण विजयी होणार व कोण पराभूत होणार, याचा अंदाज बांधत होते. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील कोरोनेशन हॉल, रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील इनडोअर स्टेडिअम, मालेगावातील तहसील कार्यालय, मंगरूळपीर येथील लालबहादूर शास्त्री भवन, कारंजा येथील शेतकरी निवास सभागृह आणि मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी विजयी होणार्‍या उमेदवारांनी व त्यांच्या सर्मथकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. १४ व्या वित्त आयोगांतर्गत शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना मिळणारा विकास निधी आणि यंदा प्रथमच सरपंचाची निवड करण्याचे अधिकार जनतेच्या हातात आल्याने या निवडणुकीला आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने वाशिम तालुक्यातील ४८, मालेगाव तालुक्यातील ४७, रिसोड तालुक्यातील ४७, कारंजा तालुक्यातील ५0, मंगरूळपीर तालुक्यातील ३३ आणि मानोरा तालुक्यातील ४0 ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. तथापि, राजकीय पक्ष आणि पक्षांच्या चिन्हाविना ७ ऑक्टोबरला पार पडलेल्या या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केले. यामुळे यंदा मतांचा टक्काही (७८.४३) वाढला. दरम्यान, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणार्‍या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, आणि कोण पराभूत होणार, याकडे जनतेचे लक्ष लागून होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आपले वर्चस्व पणाला लावून आपल्या मर्जीतील सर्मथकांना या निवडणुकीत उतरवून ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यात काही नेत्यांच्या गटांना यश मिळाले; तर काहींना अपयशाचे तोंड पाहावे लागले.

सरपंच वेगळ्या गटाचा; तर सदस्य वेगळ्या गटाचे!ग्रामपंचायतीची निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसून, स्वतंत्र गट तयार करून ती लढविली जाते. त्यानुसार, स्वतंत्र पॅनेल तयार करून उमेदवारांनी निवडणूक लढली; मात्र यंदा प्रथमच सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाल्याने सरपंच एका गटाचा, तर निवडून आलेले सदस्य दुसर्‍याच गटाचे, अशी गोची झाल्याने भविष्यात ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा गाडा हाकताना मतभेद उफाळून येण्याचे संकेत या निवडणुकीने दिले आहेत.