शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

ग्रामीण जनतेचा नवख्या चेहर्‍यांना कौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:09 IST

वाशिम: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यात विजयी होणार्‍या उमेदवारांनी आपल्या सर्मथकांसह जल्लोष साजरा केला. दरम्यान, सार्वत्रिक निकालावरून ग्रामीण जनतेने त्याच त्या चेहर्‍यांना डावलत बहुतांशी नवख्या चेहर्‍यांना कौल देत परिवर्तन घडविल्याचे पाहावयास मिळाले. यंदा प्रथमच सरपंचपाची निवड थेट जनतेतून झाल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. 

ठळक मुद्दे२७३ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीरगुलालांची उधळण करत विजयी उमेदवारांचा सर्मथकांसह जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यात विजयी होणार्‍या उमेदवारांनी आपल्या सर्मथकांसह जल्लोष साजरा केला. दरम्यान, सार्वत्रिक निकालावरून ग्रामीण जनतेने त्याच त्या चेहर्‍यांना डावलत बहुतांशी नवख्या चेहर्‍यांना कौल देत परिवर्तन घडविल्याचे पाहावयास मिळाले. यंदा प्रथमच सरपंचपाची निवड थेट जनतेतून झाल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. २७३ पैकी निवडणुकीपूर्वीच १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ७  ऑक्टोबर रोजी जिल्हय़ातील सहाही तालुक्यांमधील २६१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. मतदानानंतर गावागावात राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पॅनल लढविणारे नेते व गावातील काही नागरिक कोण विजयी होणार व कोण पराभूत होणार, याचा अंदाज बांधत होते. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील कोरोनेशन हॉल, रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील इनडोअर स्टेडिअम, मालेगावातील तहसील कार्यालय, मंगरूळपीर येथील लालबहादूर शास्त्री भवन, कारंजा येथील शेतकरी निवास सभागृह आणि मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी विजयी होणार्‍या उमेदवारांनी व त्यांच्या सर्मथकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. १४ व्या वित्त आयोगांतर्गत शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना मिळणारा विकास निधी आणि यंदा प्रथमच सरपंचाची निवड करण्याचे अधिकार जनतेच्या हातात आल्याने या निवडणुकीला आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने वाशिम तालुक्यातील ४८, मालेगाव तालुक्यातील ४७, रिसोड तालुक्यातील ४७, कारंजा तालुक्यातील ५0, मंगरूळपीर तालुक्यातील ३३ आणि मानोरा तालुक्यातील ४0 ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. तथापि, राजकीय पक्ष आणि पक्षांच्या चिन्हाविना ७ ऑक्टोबरला पार पडलेल्या या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केले. यामुळे यंदा मतांचा टक्काही (७८.४३) वाढला. दरम्यान, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणार्‍या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, आणि कोण पराभूत होणार, याकडे जनतेचे लक्ष लागून होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आपले वर्चस्व पणाला लावून आपल्या मर्जीतील सर्मथकांना या निवडणुकीत उतरवून ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यात काही नेत्यांच्या गटांना यश मिळाले; तर काहींना अपयशाचे तोंड पाहावे लागले.

सरपंच वेगळ्या गटाचा; तर सदस्य वेगळ्या गटाचे!ग्रामपंचायतीची निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसून, स्वतंत्र गट तयार करून ती लढविली जाते. त्यानुसार, स्वतंत्र पॅनेल तयार करून उमेदवारांनी निवडणूक लढली; मात्र यंदा प्रथमच सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाल्याने सरपंच एका गटाचा, तर निवडून आलेले सदस्य दुसर्‍याच गटाचे, अशी गोची झाल्याने भविष्यात ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा गाडा हाकताना मतभेद उफाळून येण्याचे संकेत या निवडणुकीने दिले आहेत.