शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आधार जोडणीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ

By admin | Updated: June 29, 2015 01:22 IST

महाशिबिराला अल्प प्रतिसाद; ३0 जूनपर्यंत ८५ टक्क्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार.

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार जिल्हय़ातील मतदारांची आधार कार्डशी जोडणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सध्या चांगलीच धावपळ होत आहे. दरम्यान, २८ जून रोजी त्यानुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिरालाही जिल्हय़ात मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याने ३0 जून अखेर ८५ टक्के मतदारांची आधारशी जोडणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची कसरत जिल्हा निवडणूक विभागाला करावी लागणार आहे. मतदार याद्या प्रामाणीकरण व शुद्धीकरण मोहीम जिल्हय़ात मार्च महिन्यापासून राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ात ११.११ टक्केच मतदारांची आधार कार्डशी जोडणी झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांशी तुलना करता वाशिम जिल्हा हा राज्यात पिछाडीवर पडला आहे. त्यानुषंगाने ३१ जुलै अखेर १00 टक्के आधारकार्डशी मतदार याद्यांचे लिंकअप होणे क्रमप्राप्त आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाला सध्या चांगलीच धावपळ करावी लागत आहे. ही मोहीम प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे (निवडणूक) तथा सहाही तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी सध्या जोरकसपणे प्रयत्न करीत आहे. २८ जूनच्या महाशिबिराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हय़ातील अनेक मतदान केंद्रावर या अधिकार्‍यांनी भेटी देऊन प्रत्यक्षात मतदारांचा या मोहिमेस कितपत प्रतिसाद मिळतो, याची पाहणी केली. एप्रिल, मे आणि जून या तीनही महिन्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हास्तरावर महाशिबिर आयोजित केले आहेत. १२ एप्रिल, १८ मे आणि आता २८ जून अशी तीन महाशिबिरे या निमित्ताने झाली आहेत. मात्र, अद्यापही मतदारांचे आधार कार्डशी जोडणीची टक्केवारी ही १५ टक्क्यांपुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. अन्य जिल्हय़ात हे प्रमाण वाढत असून, वाशिम जिल्हा यामध्ये पिछाडीवर पडला आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात २२ जूनपर्यंत नऊ लाख १८ हजार ३८४ मतदारांपैकी अवघे ११.११ टक्के मतदारांचे आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. त्यामुले वाशिम जिल्हा आधारलिंक संदर्भात राज्यात पिछाडीवर पडला आहे. आता अवघ्या एका महिन्यात जिल्हा प्रशासनाला आधार लिंगसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आधार लिंक केल्यास मतदार यादीतील एका ठिकाणचे नाव वगळल्या जाते. असे असताना ग्रामीण भागातील अनेक मतदारांचे शहरी भागातील मतदार याद्यांमध्ये नावे असल्याने अनेकजण आधार लिंकला प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे.