शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

आधार जोडणीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ

By admin | Updated: June 29, 2015 01:22 IST

महाशिबिराला अल्प प्रतिसाद; ३0 जूनपर्यंत ८५ टक्क्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार.

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार जिल्हय़ातील मतदारांची आधार कार्डशी जोडणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सध्या चांगलीच धावपळ होत आहे. दरम्यान, २८ जून रोजी त्यानुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिरालाही जिल्हय़ात मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याने ३0 जून अखेर ८५ टक्के मतदारांची आधारशी जोडणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची कसरत जिल्हा निवडणूक विभागाला करावी लागणार आहे. मतदार याद्या प्रामाणीकरण व शुद्धीकरण मोहीम जिल्हय़ात मार्च महिन्यापासून राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ात ११.११ टक्केच मतदारांची आधार कार्डशी जोडणी झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांशी तुलना करता वाशिम जिल्हा हा राज्यात पिछाडीवर पडला आहे. त्यानुषंगाने ३१ जुलै अखेर १00 टक्के आधारकार्डशी मतदार याद्यांचे लिंकअप होणे क्रमप्राप्त आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाला सध्या चांगलीच धावपळ करावी लागत आहे. ही मोहीम प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे (निवडणूक) तथा सहाही तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी सध्या जोरकसपणे प्रयत्न करीत आहे. २८ जूनच्या महाशिबिराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हय़ातील अनेक मतदान केंद्रावर या अधिकार्‍यांनी भेटी देऊन प्रत्यक्षात मतदारांचा या मोहिमेस कितपत प्रतिसाद मिळतो, याची पाहणी केली. एप्रिल, मे आणि जून या तीनही महिन्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हास्तरावर महाशिबिर आयोजित केले आहेत. १२ एप्रिल, १८ मे आणि आता २८ जून अशी तीन महाशिबिरे या निमित्ताने झाली आहेत. मात्र, अद्यापही मतदारांचे आधार कार्डशी जोडणीची टक्केवारी ही १५ टक्क्यांपुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. अन्य जिल्हय़ात हे प्रमाण वाढत असून, वाशिम जिल्हा यामध्ये पिछाडीवर पडला आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात २२ जूनपर्यंत नऊ लाख १८ हजार ३८४ मतदारांपैकी अवघे ११.११ टक्के मतदारांचे आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. त्यामुले वाशिम जिल्हा आधारलिंक संदर्भात राज्यात पिछाडीवर पडला आहे. आता अवघ्या एका महिन्यात जिल्हा प्रशासनाला आधार लिंगसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आधार लिंक केल्यास मतदार यादीतील एका ठिकाणचे नाव वगळल्या जाते. असे असताना ग्रामीण भागातील अनेक मतदारांचे शहरी भागातील मतदार याद्यांमध्ये नावे असल्याने अनेकजण आधार लिंकला प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे.