शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

आधार जोडणीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ

By admin | Updated: June 29, 2015 01:22 IST

महाशिबिराला अल्प प्रतिसाद; ३0 जूनपर्यंत ८५ टक्क्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार.

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार जिल्हय़ातील मतदारांची आधार कार्डशी जोडणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सध्या चांगलीच धावपळ होत आहे. दरम्यान, २८ जून रोजी त्यानुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिरालाही जिल्हय़ात मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याने ३0 जून अखेर ८५ टक्के मतदारांची आधारशी जोडणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची कसरत जिल्हा निवडणूक विभागाला करावी लागणार आहे. मतदार याद्या प्रामाणीकरण व शुद्धीकरण मोहीम जिल्हय़ात मार्च महिन्यापासून राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ात ११.११ टक्केच मतदारांची आधार कार्डशी जोडणी झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांशी तुलना करता वाशिम जिल्हा हा राज्यात पिछाडीवर पडला आहे. त्यानुषंगाने ३१ जुलै अखेर १00 टक्के आधारकार्डशी मतदार याद्यांचे लिंकअप होणे क्रमप्राप्त आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाला सध्या चांगलीच धावपळ करावी लागत आहे. ही मोहीम प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे (निवडणूक) तथा सहाही तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी सध्या जोरकसपणे प्रयत्न करीत आहे. २८ जूनच्या महाशिबिराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हय़ातील अनेक मतदान केंद्रावर या अधिकार्‍यांनी भेटी देऊन प्रत्यक्षात मतदारांचा या मोहिमेस कितपत प्रतिसाद मिळतो, याची पाहणी केली. एप्रिल, मे आणि जून या तीनही महिन्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हास्तरावर महाशिबिर आयोजित केले आहेत. १२ एप्रिल, १८ मे आणि आता २८ जून अशी तीन महाशिबिरे या निमित्ताने झाली आहेत. मात्र, अद्यापही मतदारांचे आधार कार्डशी जोडणीची टक्केवारी ही १५ टक्क्यांपुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. अन्य जिल्हय़ात हे प्रमाण वाढत असून, वाशिम जिल्हा यामध्ये पिछाडीवर पडला आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात २२ जूनपर्यंत नऊ लाख १८ हजार ३८४ मतदारांपैकी अवघे ११.११ टक्के मतदारांचे आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. त्यामुले वाशिम जिल्हा आधारलिंक संदर्भात राज्यात पिछाडीवर पडला आहे. आता अवघ्या एका महिन्यात जिल्हा प्रशासनाला आधार लिंगसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आधार लिंक केल्यास मतदार यादीतील एका ठिकाणचे नाव वगळल्या जाते. असे असताना ग्रामीण भागातील अनेक मतदारांचे शहरी भागातील मतदार याद्यांमध्ये नावे असल्याने अनेकजण आधार लिंकला प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे.