शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

‘किडनॅपिंग’च्या टोळीची अफवा; नागरिक धास्तावले

By सुनील काकडे | Updated: September 19, 2022 17:45 IST

वाशिमातील काही शाळांकडून ‘सोशल मिडिया’वर प्रसारित झाले पत्र.

शहरात मुले पकडणारी (किडनॅपिंग) टोळी आल्याचे समजते. त्यामुळे पालकांनी पाल्ल्यांच्या बाबतीत सतर्क राहावे, अशा आशयाचे पत्र काही शाळांकडून आज, १९ सप्टेंबर रोजी ‘सोशल मिडीया’वर प्रसारित झाले. यामुळे मोठी खळबळ उडून नागरिक धास्तावले. मात्र, ही केवळ अफवा असून मुले पकडणारी कुठलीही टोळी जिल्ह्यात आढळलेली नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले.

शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्वच मुलांचे पालक पाल्ल्यांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करू शकत नाही. अशा स्थितीत काही शाळांकडून आज मुख्याध्यापकांची सही, शिक्क्यानिशी पत्र प्रसारित करून वाशिम शहरात मुले पकडणारी टोळी आल्याचे समजते. त्यामुळे पालकांनी पाल्ल्यांच्या बाबतीत सतर्क राहावे. आपला पाल्य कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जाणार नाही, याची खात्री करून घ्यावी. आपण पाल्ल्याच्या ऑटोचालकालाही ही सूचना द्यावी व आपल्या पाल्ल्यास शाळेतून नेण्याकरिता कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पाठवू नये, अशी सूचना केली. हे पत्र ‘व्हाट्सॲप’वरील विविध ग्रुपवर झपाट्याने प्रसारित झाल्यामुळे मोठी खळबळ माजली. वाशिम शहरात खरोखरच मुले पकडणारी टोळी आली की काय, अशी भीती वर्तविण्यात येऊ लागली; मात्र ही केवळ अफवा असून असा प्रकार जिल्ह्यात कुठेही उघडकीस आलेला नाही, असे स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले.मुले पकडणारी कुठलीही टोळी जिल्ह्यात आलेली नाही. असा कुठलाही प्रकार कुठेही घडलेला नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असून शाळांच्या संचालकांनी अशा आशयाचे कुठलेही पत्र प्रसारित करण्यापूर्वी सारासार विचार करावा. नागरिकांनी मनात कुठलीही भीती बाळगू नये.बच्चन सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :Kidnappingअपहरण