शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आरटीई : प्रवेशपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:10 IST

आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्या व दुसऱ्या लॉटरी पद्धतीत निवड होऊनही विहित मुदतीत ३७८ बालकांनी प्रवेश घेतले नाहीत. आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची आणि त्यानंतर दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे. विहित मुदतीत पालकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर न केल्याने किंवा शिक्षण विभाग, संबंधित शाळेशी संपर्क न साधल्याने प्रवेशपात्र ९३१ पैकी ३७८ बालकांचे प्रवेश झाले नाहीत. उर्वरीत ५५३ बालकांनी प्रवेश घेतले. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी तिसरी लॉटरी सोडत काढण्यात आली. यावेळी २७० बालकांची निवड झाली. ११ जुलैपासून या बालकांच्या पालकांना ‘एसएमएस’ पाठविले जात आहेत. एसएमएस न आल्यास शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘अ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्स’मध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निवडपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, १६ जुलैपर्यंत ५८ बालकांचे प्रवेश झाले.१८ जुलैपर्यंत पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून, निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. १८ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.तिसºया लॉटरी पद्धतीतून जिल्ह्यातील २७० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली आहे. या बालकांच्या कागदपत्रांची १८ जुलैपर्यंत पडताळणी केली जाणार आहे. निवडपात्र बालकांच्या पालकांनी १८ जुलैपर्यंत संबंधित पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा