शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुलासाठी खोदलेल्या रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:42 IST

किन्हीराजा हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील जवळपास १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. बसथांब्यावरून गावात जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम ...

किन्हीराजा हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील जवळपास १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. बसथांब्यावरून गावात जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यासाठी १७ एप्रिल रोजी संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. अशात सदर बांधकाम हे नियमबाह्य होत असल्याची तक्रार मालेगाव पंचायत समितीकडे करण्यात आली. त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे बांधकाम बंद करण्यात आले; मात्र मुख्य रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम झाल्याने गावातील वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यावर पोलीस चौकी, मुख्य बाजारपेठ, दवाखाने, मेडिकल व बसथांबा असल्यामुळे किन्हीराजावासीयांना ये-जा करण्यासाठी गावाच्या बाहेर असलेल्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम सुरू करतेवेळी पर्यायी वळण रस्ता करायला पाहिजे होता; मात्र संबंधित अधिकाऱ्यांना त्याचेही भान राहिले नाही. तथापि, बंद करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पवन गजानन इंगळे व भाजयुमोचे रविराज जयसिंगराव घुगे यांनी मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.