शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कारवाईचा बडगा; रिसोड नगर पालिका राबविणार मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:29 IST

रिसोड:   पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना पावसाळ्यापर्यंत व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्यासाठी रिसोड पालिकेने नियोजन केले आहे. पाण्याचा अपव्यय करणाºया नागरिकांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठरविले आहे.आवश्यकतेनुसार पाणी भरल्यानंतर नळाची तोटी काळजीपूर्वक बंद करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.

 

रिसोड:  शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अडोळ धरणात अल्प जलसाठा उरला असून, नागरिकांना पावसाळ्यापर्यंत व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्यासाठी रिसोड पालिकेने नियोजन केले आहे. या अंतर्गत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत रिसोड तालुक्यात बºयापैकी पाऊस गतवर्षी पडला; परंतु सिंचनासाठी झालेला वारेमाप उपसा, पाण्याचा सतत होणारा अपव्यय आणि रखरखत्या उन्हामुळे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील प्रकल्पही तळ गाठू लागले आहेत. त्यातच शहराला पाणी पुरवठा होणाºया अडोळ धरणातही केव्ळ २० टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न टाळल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहरात सद्यस्थितीत नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, वापराचे पाणी भरल्यानंतर घरासमोरी आवार स्वच्छ करणे, वाहने धुणे, नळाचे पाणी थेट शौचालय, स्रानगृहात सोडणे, नाल्या साफ करणे, हे प्रकार नागरिकांद्वारे सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होऊन धरणातील साठा झपाट्याने कमी होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अपव्यय करणाºया नागरिकांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठरविले आहे. यासाठी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पाणी भरल्यानंतर नळाची तोटी काळजीपूर्वक बंद करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. त्यानंतरही कोणी पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 

 पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता शहरात पाण्याचा अपव्यय करणाºयांवर कठोर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. सातत्याने होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच ही कारवाई करणे नगर पालिकेला अनिवार्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे.

-अलंकार खैरे, पाणी पुरवठा सभापती, नगर पालिका रिसोड

 

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड