शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कारवाईचा बडगा; रिसोड नगर पालिका राबविणार मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:29 IST

रिसोड:   पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना पावसाळ्यापर्यंत व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्यासाठी रिसोड पालिकेने नियोजन केले आहे. पाण्याचा अपव्यय करणाºया नागरिकांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठरविले आहे.आवश्यकतेनुसार पाणी भरल्यानंतर नळाची तोटी काळजीपूर्वक बंद करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.

 

रिसोड:  शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अडोळ धरणात अल्प जलसाठा उरला असून, नागरिकांना पावसाळ्यापर्यंत व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्यासाठी रिसोड पालिकेने नियोजन केले आहे. या अंतर्गत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत रिसोड तालुक्यात बºयापैकी पाऊस गतवर्षी पडला; परंतु सिंचनासाठी झालेला वारेमाप उपसा, पाण्याचा सतत होणारा अपव्यय आणि रखरखत्या उन्हामुळे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील प्रकल्पही तळ गाठू लागले आहेत. त्यातच शहराला पाणी पुरवठा होणाºया अडोळ धरणातही केव्ळ २० टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न टाळल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहरात सद्यस्थितीत नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, वापराचे पाणी भरल्यानंतर घरासमोरी आवार स्वच्छ करणे, वाहने धुणे, नळाचे पाणी थेट शौचालय, स्रानगृहात सोडणे, नाल्या साफ करणे, हे प्रकार नागरिकांद्वारे सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होऊन धरणातील साठा झपाट्याने कमी होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अपव्यय करणाºया नागरिकांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठरविले आहे. यासाठी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पाणी भरल्यानंतर नळाची तोटी काळजीपूर्वक बंद करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. त्यानंतरही कोणी पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 

 पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता शहरात पाण्याचा अपव्यय करणाºयांवर कठोर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. सातत्याने होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच ही कारवाई करणे नगर पालिकेला अनिवार्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे.

-अलंकार खैरे, पाणी पुरवठा सभापती, नगर पालिका रिसोड

 

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड