शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कारवाईचा बडगा; रिसोड नगर पालिका राबविणार मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:29 IST

रिसोड:   पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना पावसाळ्यापर्यंत व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्यासाठी रिसोड पालिकेने नियोजन केले आहे. पाण्याचा अपव्यय करणाºया नागरिकांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठरविले आहे.आवश्यकतेनुसार पाणी भरल्यानंतर नळाची तोटी काळजीपूर्वक बंद करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.

 

रिसोड:  शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अडोळ धरणात अल्प जलसाठा उरला असून, नागरिकांना पावसाळ्यापर्यंत व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्यासाठी रिसोड पालिकेने नियोजन केले आहे. या अंतर्गत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत रिसोड तालुक्यात बºयापैकी पाऊस गतवर्षी पडला; परंतु सिंचनासाठी झालेला वारेमाप उपसा, पाण्याचा सतत होणारा अपव्यय आणि रखरखत्या उन्हामुळे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील प्रकल्पही तळ गाठू लागले आहेत. त्यातच शहराला पाणी पुरवठा होणाºया अडोळ धरणातही केव्ळ २० टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न टाळल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहरात सद्यस्थितीत नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, वापराचे पाणी भरल्यानंतर घरासमोरी आवार स्वच्छ करणे, वाहने धुणे, नळाचे पाणी थेट शौचालय, स्रानगृहात सोडणे, नाल्या साफ करणे, हे प्रकार नागरिकांद्वारे सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होऊन धरणातील साठा झपाट्याने कमी होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अपव्यय करणाºया नागरिकांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठरविले आहे. यासाठी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पाणी भरल्यानंतर नळाची तोटी काळजीपूर्वक बंद करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. त्यानंतरही कोणी पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 

 पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता शहरात पाण्याचा अपव्यय करणाºयांवर कठोर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. सातत्याने होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच ही कारवाई करणे नगर पालिकेला अनिवार्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे.

-अलंकार खैरे, पाणी पुरवठा सभापती, नगर पालिका रिसोड

 

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड