शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

रिसोडची बाजारपेठ बुधवारपर्यंत राहणार बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:33 IST

दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : जिल्ह्यात ११ जूनपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या रिसोड तालुक्यात १२ जूनला कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ जून, रविवारी दुपारी २ वाजतापासून ते बुधवार, १७ जूनपर्यंत बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला.रिसोड तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने नागरिक बिनधास्त शहरात फिरत होते. बाजारपेठेतही विविध वस्तू, साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी होत होती. १२ जून रोजी दोन आणि १३ जून रोजी ३ असे दोन दिवसात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने व्यापाऱ्यांसह आरोग्य यंत्रणा, पोलीस व तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रिसोड येथील व्यापारी महासंघाने स्वयंस्फुर्तीने रिसोड बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय १४ जून रोजी रिसोड व्यापारी महासंघातर्फे येथील व्यापारी संजय बगडिया यांचे दुकानावर आयोजित सभेमध्ये घेतला. बुधवार, १७ जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यादरम्यान १८ जूनपासून व्यापार सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत गुरुवारपासून सुरू होणाºया दुकानांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी २ अशी राहिल, असे ठरविण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, याला जनतेने देखील सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यापारी संघटनने व्यक्त केली. रिसोड शहरात ग्रामीण भागातून विशेषत: अन्य कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. बैठकीला व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

व्यापारी मंडळाचे वाशिम बंदचे आवाहनवाशिम शहरातील व्यापाºयांनी आपापली दुकाने बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केले. दरम्यान दुसºया संघटनेने मात्र बाजारपेठ बंदबाबत ठोस भूमिका न घेतल्याने संभ्रम निर्माण झाला.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे पाऊल उचलणे आवश्यक झाले होते. शहरात दिवसेंदिवस गर्दी वाढत होती. व्यापाºयांवर बंदचा परिणाम होईल; मात्र आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेणे आवश्यक होते.- मदनसेठ बगडियाअध्यक्ष, व्यापारी महासंघ रिसोड

 

 

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड