शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वाशिम जिल्ह्यात महसूलची ‘आॅनलाईन’ प्रणाली विस्कळित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:25 IST

तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात ‘आॅनलाईन’ फेरफार घेण्यासह सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज ज्या ‘वेबसाईट’वरून दिल्या जायचे, त्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली. मात्र, त्यातही विविध स्वरूपातील तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.महसूल विभागाकडून तलाठ्यांमार्फत पुर्वी हस्तलिखीत स्वरूपात दिला जाणारी सातबारा, फेरफार, आठ ‘अ’ ही कागदपत्रे आता ‘आॅनलाईन’ पद्धतीने तथा संबंधित अधिकाºयांच्या डिजीटल स्वाक्षरीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नागरिक तथा शेतकºयांना सदर कागदपत्रे मिळविण्याकरिता आता नाईलाजास्ताव सेतू सुविधा केंद्र अथवा संबंधित तलाठ्यांकडील संगणकांमध्ये असलेल्या ‘वेबसाईट’वर विसंबून राहावे लागत आहे. असे असताना यासंदर्भातील अन्य सर्व वेबसाईट शासनाने बंद करून केवळ ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू केली; परंतु त्याबाबत जिल्ह्यातील तलाठ्यांना कुठलेही विशेष प्रशिक्षण देण्यात आले नसून सेतू सुविधा केंद्रांमध्येही ही वेबसाईट हाताळताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार घेण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांवर नित्यनेम गर्दी करित आहेत. मात्र, त्यांना ही कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. ही समस्या गेल्या महिनाभरापासून भेडसावत असून याकडे महसूल विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.  तलाठी गुंतले निवडणूकीच्या कामातपुर्वीच्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘वेबसाईट’वर कामे करताना सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाºयांना विविध स्वरूपातील अडचणी जात आहेत. याशिवाय संबंधित नव्या ‘वेबसाईट’वरून दस्तावेज काढणेही अशक्य होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच तलाठी सद्या लोकसभा निवडणूकीच्या कामकाजात गुंतल्यामुळे अडचणीत भर पडली असून नागरिकांसह शेतकºयांची तारांबळ उडत आहे. शेतकºयांचे आर्थिक व्यवहार खोळंबलेशेतजमिनीचा सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार आदी दस्तावेजांच्या आधारे चालणारे शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कागदपत्र मिळणे कठीण झाल्याने खोळंबले आहेत. ग्रामीण भागातील सेतू सुविधा केंद्रावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांसह शेतकºयांची तुफान गर्दी होत आहे. मात्र, कागदपत्रांविनाच संबंधितांना परतावे लागत असल्याने त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येमुळे सेतू सुविधा केंद्रांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग