शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या घोषणेचा व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम

By admin | Updated: May 15, 2017 19:16 IST

वाशिम: नाफेडच्या खरेदी कें द्रावर तूर कल्लोळ सुरू असतानाच, शासनाच्या इशाऱ्यानंतरही व्यापारी हमीभावाने तूर खरेदी करीत नसल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.

ऑनलाइन लोकमत

वाशिम: नाफेडच्या खरेदी कें द्रावर तूर कल्लोळ सुरू असतानाच हमीभावाने तूर खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी कायदा करण्याची आणि नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावे तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे; परंतु शासनाच्या इशाऱ्यानंतरही व्यापारी हमीभावाने तूर खरेदी करीत नसल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. यंदा राज्यभरात तुरीचे उत्पादन चांगले झाले. त्यामुळे बाजार समित्यांकडे मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. तथापि, शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव व्यापाऱ्यांकडून मिळत नसल्याने शासनाकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला; परंतु तो फार काळ टिकला नाही. शासनाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका शेतकऱ्यांना बसला. कधी साठवणूकीची अडचण, तर कधी बारदाण्याचा तुटवडा अशा कारणांमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमधी ओट्यावर महिना महिना तुरीच्या रखवालीसाठी जागरण करावे लागले. दुसरीकडे व्यापारी कोणत्याच स्थितीत तुरीला हमीभाव देण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांची गत इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. त्यातही नाफेडची खरेदी वारंवार बंद पडल्याने शेतकऱ्यांना वाहनांचा खर्चच एवढा लागला की, त्यांना व्यापाऱ्यांपेक्षाही नाफेडकडे तूर विक्री के ल्याचा अधिकच तोटा झाला. या सर्व गदारोळादरम्यान दस्तूरखुद्द मुख्यमंत्री फडवणीस यांनी हमी भावाने तूर खरेदी न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी कायदा करण्याची घोषणा केली, तसेच राज्यातील अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर घेऊन नाफेडला विकल्याचा संशय असल्याने व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे मध्यंतरी सांगण्यात येत होते. या सर्व प्रकारांमुळे व्यापाऱ्यांनी काही दिवस तूर खरेदी बंद केली. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून काही ठिकाणी ती सुरू झाली असली तरी, व्यापाऱ्यांकडून अद्यापही तुरीला हमीभाव मिळत नसल्याचे दिसत असून, त्यांनी खरेदीला थोडा आवर घातल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात मागील दोन दिवसांत व्यापाऱ्यांनी केवळ तीन हजार क्विंटल तूर खरेदी केली, तर मानोऱ्यातील व्यापाऱ्यांनी याच दोन दिवसांत केवळ दीड हजार क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती बाजार समित्यांमधून प्राप्त झाली. या दोन्ही ठिकाणी तुरीला कमाल चार हजारांच्या आतच प्रति क्विंटलचे दर मिळाल्याचेही कळले आहे. त्यात मानोरा येथे ३ हजार ९०० तर कारंजा येथे ३ हजार ९८० रुपये कमाल दर शेतकऱ्यांना मिळू शकले. हे दर हमीभावापेक्षा हजार रुपयांहून अधिक कमी असल्याने व्यापारी शासनाच्या घोषणेलाच भाव देत नसल्याचे दिसत आहे.