शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यस्तरीय सर्वेक्षणासाठी रिसोड नगर परिषद सज्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:37 IST

रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देस्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार आहे.सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले.

रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. रिसोड शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी तत्कालिन नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सन २०१६-१७ मध्ये सर्व पदाधिकारी, नगर सेवक तसेच शहरवासियांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविले होते. त्या अनुषंगाने सर्वांचेच सहकार्य लाभल्याने रिसोड शहराची हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषणा करण्यात आली होती. आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान आहे. त्या अनुषंगाने कर्मचाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुरक्षिततेसाठी कर्मचाºयांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले. सन २०१८ मध्ये स्वच्छतेसंदर्भात शासनाकडून शहराचे सर्वेक्षण सुद्धा होणार आहे. या सर्वेक्षणानवरून शहराला स्वच्छतेचे गुणांकन देण्यात येणार आहे. स्पर्धेत टिकण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेने कर्मचाºयांचे पथकही गठीत केले आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे १२ तासात निराकरण करण्याचे लक्ष्य आहे, असे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सांगितले. स्वच्छताविषयक कामे करताना  कर्मचाºयांच्या सुरक्षेची काळजी म्हणून नगर परिषदेतर्फे  प्रत्येक कर्मचाºयाला सुरक्षाविषयक साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भारती क्षिरसागर होत्या. भारती क्षिरसागर यांनी यावेळी स्वच्छतेचे महत्व जाणून स्वच्छतेचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व कर्मचारी मेहनत करीत आहेतच. परंतु त्याचबरोबर नागरिकांचासुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून या अभियानामध्ये समावेश वाढविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी नगर विकास विभागाने विकसीत केलेल्या स्वच्छता अ‍ँड्राईड अ‍ॅपचा जास्तीत जास्त उपयोग करुन या अभियानात सहभाग नोदंवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला उपाध्यक्षा संगीता मोरे, नगर सेविका पप्पीबाई कदम, सतिष इरतकर, माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख,  प्रतिष्ठीत नागरिक अरूण मगर, अरूण  क्षिरसागर, रियाज खान पठान आदींची उपस्थिती होती.

‘स्वच्छता अ‍ॅप’वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने विकसित केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या स्वच्छताविषयक तक्रार नोंदविता येणार आहे. सदर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर पसंतीची भाषा निवडावी लागणार आहे. अ‍ॅप हा आपला मोबाईल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करावा. तुम्हाला लगेच ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा (पोस्ट यूवर फर्स्ट कम्प्लेंट) वर क्लिक करावे लागेल. आता अस्वच्छतेबाबतची तक्रार छायाचित्रासह नोंदवावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर खालीच ‘पोस्ट करा’ शब्द दिसताच, त्यावर क्लिक केले की तक्रार पोहोचल्याचा संदेश दिसणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली.