शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय सर्वेक्षणासाठी रिसोड नगर परिषद सज्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:37 IST

रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देस्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार आहे.सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले.

रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. रिसोड शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी तत्कालिन नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सन २०१६-१७ मध्ये सर्व पदाधिकारी, नगर सेवक तसेच शहरवासियांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविले होते. त्या अनुषंगाने सर्वांचेच सहकार्य लाभल्याने रिसोड शहराची हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषणा करण्यात आली होती. आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान आहे. त्या अनुषंगाने कर्मचाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुरक्षिततेसाठी कर्मचाºयांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले. सन २०१८ मध्ये स्वच्छतेसंदर्भात शासनाकडून शहराचे सर्वेक्षण सुद्धा होणार आहे. या सर्वेक्षणानवरून शहराला स्वच्छतेचे गुणांकन देण्यात येणार आहे. स्पर्धेत टिकण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेने कर्मचाºयांचे पथकही गठीत केले आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे १२ तासात निराकरण करण्याचे लक्ष्य आहे, असे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सांगितले. स्वच्छताविषयक कामे करताना  कर्मचाºयांच्या सुरक्षेची काळजी म्हणून नगर परिषदेतर्फे  प्रत्येक कर्मचाºयाला सुरक्षाविषयक साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भारती क्षिरसागर होत्या. भारती क्षिरसागर यांनी यावेळी स्वच्छतेचे महत्व जाणून स्वच्छतेचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व कर्मचारी मेहनत करीत आहेतच. परंतु त्याचबरोबर नागरिकांचासुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून या अभियानामध्ये समावेश वाढविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी नगर विकास विभागाने विकसीत केलेल्या स्वच्छता अ‍ँड्राईड अ‍ॅपचा जास्तीत जास्त उपयोग करुन या अभियानात सहभाग नोदंवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला उपाध्यक्षा संगीता मोरे, नगर सेविका पप्पीबाई कदम, सतिष इरतकर, माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख,  प्रतिष्ठीत नागरिक अरूण मगर, अरूण  क्षिरसागर, रियाज खान पठान आदींची उपस्थिती होती.

‘स्वच्छता अ‍ॅप’वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने विकसित केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या स्वच्छताविषयक तक्रार नोंदविता येणार आहे. सदर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर पसंतीची भाषा निवडावी लागणार आहे. अ‍ॅप हा आपला मोबाईल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करावा. तुम्हाला लगेच ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा (पोस्ट यूवर फर्स्ट कम्प्लेंट) वर क्लिक करावे लागेल. आता अस्वच्छतेबाबतची तक्रार छायाचित्रासह नोंदवावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर खालीच ‘पोस्ट करा’ शब्द दिसताच, त्यावर क्लिक केले की तक्रार पोहोचल्याचा संदेश दिसणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली.