शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय सर्वेक्षणासाठी रिसोड नगर परिषद सज्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:37 IST

रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देस्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार आहे.सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले.

रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. रिसोड शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी तत्कालिन नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सन २०१६-१७ मध्ये सर्व पदाधिकारी, नगर सेवक तसेच शहरवासियांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविले होते. त्या अनुषंगाने सर्वांचेच सहकार्य लाभल्याने रिसोड शहराची हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषणा करण्यात आली होती. आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान आहे. त्या अनुषंगाने कर्मचाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुरक्षिततेसाठी कर्मचाºयांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले. सन २०१८ मध्ये स्वच्छतेसंदर्भात शासनाकडून शहराचे सर्वेक्षण सुद्धा होणार आहे. या सर्वेक्षणानवरून शहराला स्वच्छतेचे गुणांकन देण्यात येणार आहे. स्पर्धेत टिकण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेने कर्मचाºयांचे पथकही गठीत केले आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे १२ तासात निराकरण करण्याचे लक्ष्य आहे, असे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सांगितले. स्वच्छताविषयक कामे करताना  कर्मचाºयांच्या सुरक्षेची काळजी म्हणून नगर परिषदेतर्फे  प्रत्येक कर्मचाºयाला सुरक्षाविषयक साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भारती क्षिरसागर होत्या. भारती क्षिरसागर यांनी यावेळी स्वच्छतेचे महत्व जाणून स्वच्छतेचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व कर्मचारी मेहनत करीत आहेतच. परंतु त्याचबरोबर नागरिकांचासुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून या अभियानामध्ये समावेश वाढविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी नगर विकास विभागाने विकसीत केलेल्या स्वच्छता अ‍ँड्राईड अ‍ॅपचा जास्तीत जास्त उपयोग करुन या अभियानात सहभाग नोदंवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला उपाध्यक्षा संगीता मोरे, नगर सेविका पप्पीबाई कदम, सतिष इरतकर, माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख,  प्रतिष्ठीत नागरिक अरूण मगर, अरूण  क्षिरसागर, रियाज खान पठान आदींची उपस्थिती होती.

‘स्वच्छता अ‍ॅप’वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने विकसित केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या स्वच्छताविषयक तक्रार नोंदविता येणार आहे. सदर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर पसंतीची भाषा निवडावी लागणार आहे. अ‍ॅप हा आपला मोबाईल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करावा. तुम्हाला लगेच ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा (पोस्ट यूवर फर्स्ट कम्प्लेंट) वर क्लिक करावे लागेल. आता अस्वच्छतेबाबतची तक्रार छायाचित्रासह नोंदवावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर खालीच ‘पोस्ट करा’ शब्द दिसताच, त्यावर क्लिक केले की तक्रार पोहोचल्याचा संदेश दिसणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली.