शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

तंटामुक्त पुरस्कार रक्कमेचा गैरवापर झाल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:37 IST

करंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार  रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची तक्रार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

ठळक मुद्देसखोल चौकशी करा दोषिंवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार  रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. तेव्हा या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची लेखी तक्रार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. परंतु यावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. करंजी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नारायण निवृत्ती लहाने यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, व पंचायत समिती मालेगाव यांना लेखी देवुन गावाला मिळालेल्या तीन लाख रुपयाचा पुरस्कार शासन परिपत्रकाप्रमाणे केला नाही , तेव्हा सदर  कामाची सखोल चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. जवळपास एक महिन्यानंतर सदर तक्रारीची दखल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेवुन सदर पुरस्कार रक्कमेचा गैरव्यवहार केल्याबाबत सखोल चौकशी करुन आपला अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह कार्यालयास सादर करण्याचे पत्र गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांना दिले होते. एक महिन्याचा कालावधी उलटुनही गटविकास अधिकारी यांनी अद्यापपर्यंत कोणतीच चौकशी केल्या नसल्याचा आरोप तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नारायण लहाने यांनी सांगितले . तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात सर्व गैरव्यवहार हा ग्रामपंचायत सचिव व संबंधीत सरपंच  यांनी केला असे म्हटले आहे. २०१० ते २०१७ या सहा ते सात वर्षात आतापर्यंत तीन सचिव बदलुन गेले आहेत. प्रत्येकांनी पुरस्कार रक्कमेचा गैरव्यवहार केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वारंवार रक्कमेच्या विनियोगाबाबत विचारुनही  माहिती देत नसल्याामुळे तंटामुक्त अध्यक्ष यांनी १८ आॅक्टोंबर रोजी माहितीच्या अधिकारात पत्र देवुन माहिती मागितली आहे. गावकºयांनी गावाला पुरस्कार मिळवुन दिला,मात्र त्या रक्कमेचा योग्य प्रकारे विनियोग केला नाही, त्यामुळे गाव समितीचा उत्साह कमी झाला असुन योग्य न्याय देण्याची मागणी समितीने केले आहे. २८ आॅक्टोंबर  ग्रामपंचायत सचिव यांना भ्रमणध्वनी लावला असता ते कव्हरेज  क्षेत्राच्याबाहेर होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत