शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित शेतक-यांना वनवास!

By admin | Updated: December 19, 2014 01:02 IST

१४ वर्षांपासून शेतमालकी नाही: कृषी योजनांपासून वंचित.

विजय शिंदे/ आकोट (जि. अकोला) व्याघ्र प्रकल्पामुळे मेळघाट अभयारण्यामधून पुनर्वसित झालेल्या आकोट तालुक्यातील कोहा, कुंड, बोरी या गावातील आदिवासी शेतकर्‍यांना गत १४ वर्षांपासून अद्यापही शेतीची मालकी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे शासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने पुनर्वसित शेतकर्‍यांचा वनवास कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती जिल्ह्यातून कोहा, कुंड, बोरी या गावाचे पुनर्वसन सन २00१-0२ मध्ये अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात करण्यात आले. पुनर्वसनामुळे शेकडो आदिवासी कुंटुबांनी आपल्या मालकीची शेतजमीन व्याघ्र प्रकल्पाला दिली; परंतु त्यांना अद्यापही घराव्यतिरिक्त फक्त भोगवटदार वर्ग-२ म्हणून वहितीकरिता जमीन देण्यात आली; मात्र या जमिनीची मालकी शासनाकडे आहे. त्यामुळे जमिनीचे वहिवाटदार एवढीच ओळख या शेतकर्‍यांची आहे. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन अधिनियमनुसार वहितीकरिता वाटप झालेल्या शेतजमिनीच्या ७-१२ वर भोगवटदाराचे नाव असते, तर वाटप झालेल्या दिनांकापासून १0 वर्षांनी त्या जमिनी वहीवाट वर्ग-१ म्हणजे मालकीच्या करण्याच्या सूचना ११ जून २00४ च्या शासन निर्णयानुसार देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा शासनाने अद्यापही ही शेतजमीन पुनर्वसित शेतकर्‍यांच्या नावाने केली नाही. पुनर्वसित शेतकरी हे पूर्वी भोगवटदार वर्ग-१ होते, की भोगवटदार वर्ग-२ ही माहिती व तशी यादी उपवनसंरक्षक मेळघाट प्रकल्प यांना मागितली आहे; परंतु अद्याप माहिती पुरविण्यात आली नाही. माहिती आल्यावर मालकी देण्याबाबत शासन निर्णयानुसार कारवाई केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी स्पष्ट केले.