शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित शेतक-यांना वनवास!

By admin | Updated: December 19, 2014 01:02 IST

१४ वर्षांपासून शेतमालकी नाही: कृषी योजनांपासून वंचित.

विजय शिंदे/ आकोट (जि. अकोला) व्याघ्र प्रकल्पामुळे मेळघाट अभयारण्यामधून पुनर्वसित झालेल्या आकोट तालुक्यातील कोहा, कुंड, बोरी या गावातील आदिवासी शेतकर्‍यांना गत १४ वर्षांपासून अद्यापही शेतीची मालकी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे शासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने पुनर्वसित शेतकर्‍यांचा वनवास कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती जिल्ह्यातून कोहा, कुंड, बोरी या गावाचे पुनर्वसन सन २00१-0२ मध्ये अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात करण्यात आले. पुनर्वसनामुळे शेकडो आदिवासी कुंटुबांनी आपल्या मालकीची शेतजमीन व्याघ्र प्रकल्पाला दिली; परंतु त्यांना अद्यापही घराव्यतिरिक्त फक्त भोगवटदार वर्ग-२ म्हणून वहितीकरिता जमीन देण्यात आली; मात्र या जमिनीची मालकी शासनाकडे आहे. त्यामुळे जमिनीचे वहिवाटदार एवढीच ओळख या शेतकर्‍यांची आहे. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन अधिनियमनुसार वहितीकरिता वाटप झालेल्या शेतजमिनीच्या ७-१२ वर भोगवटदाराचे नाव असते, तर वाटप झालेल्या दिनांकापासून १0 वर्षांनी त्या जमिनी वहीवाट वर्ग-१ म्हणजे मालकीच्या करण्याच्या सूचना ११ जून २00४ च्या शासन निर्णयानुसार देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा शासनाने अद्यापही ही शेतजमीन पुनर्वसित शेतकर्‍यांच्या नावाने केली नाही. पुनर्वसित शेतकरी हे पूर्वी भोगवटदार वर्ग-१ होते, की भोगवटदार वर्ग-२ ही माहिती व तशी यादी उपवनसंरक्षक मेळघाट प्रकल्प यांना मागितली आहे; परंतु अद्याप माहिती पुरविण्यात आली नाही. माहिती आल्यावर मालकी देण्याबाबत शासन निर्णयानुसार कारवाई केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी स्पष्ट केले.