शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

भूसंपादनाच्या देय रकमेतून पीककर्जासह व्याजाचीही कपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:49 IST

वाशिम :  जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, सरळ खरेदी पद्धतीने मोबदलाही अदा केला जात आहे; मात्र ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करताना त्यातून थकीत पीककर्जाच्या रकमेसह त्यावरील मार्चअखेरपर्यंत होणारी व्याजाची रक्कमही कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाकडून मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड शेतक-यांमधून होत आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये संभ्रम समृद्धी महामार्गासाठी ७२ टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, सरळ खरेदी पद्धतीने मोबदलाही अदा केला जात आहे; मात्र ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करताना त्यातून थकीत पीककर्जाच्या रकमेसह त्यावरील मार्चअखेरपर्यंत होणारी व्याजाची रक्कमही कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाकडून मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड शेतक-यांमधून होत आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. त्यापैकी आजपर्यंत ७०० हेक्टरच्या आसपास जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित पात्र शेतकºयांच्या सुमारे ११००  खरेदी करून ‘रेडी रेकनर’ नुसार त्यांना मोबदला वाटप करण्यात आला आहे. दरम्यान, सदर मोबदला शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात असताना त्यातून शेतक-यांकडे असलेली पीककर्जाची थकबाकी कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांची कुठलीच नाराजी नाही; परंतु पीककर्जावरील व्याजही आधीच देय रकमेतून कपात केले जात असल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भातील कैफियत नेमकी कुणाकडे मांडावी, याबाबत अनभिज्ञ असलेल्या शेतक-यांमध्ये यामुळेच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकºयांचा आता कुठलाच विरोध राहिलेला नाही. सरळ खरेदी पद्धतीने योग्य मोबदलाही मिळत आहे; मात्र संपादित केलेल्या जमिनीच्या रकमेतून पीककर्जाच्या रकमेसह व्याजाची रक्कम कपात करणे चुकीचे आहे. यामुळे काही शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  गंगादीप राऊतशेतकरी संघर्ष समिती, वनोजा

जमीन संपादित करायची झाल्यास सातबारावर कुठलाही बोझा नसणे आवश्यक आहे. त्यामुळेच शेतकºयांना मिळणाºया मोबदल्यातून पीककर्जाची रक्कम जमा केली जात आहे. तसेच कर्जमाफीची काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असून, ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंतचे व्याजही जमा ठेवले जात आहे. फरकाची रक्कम संबंधित शेतकºयांना परत केली जाईल.- सुनील माळीक्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

सर्व बँकांच्या प्रतिनिधींची मंगळवारी बैठक!समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या जमीनधारकांकडे असलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी येत्या मंगळवारी बँक प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात हा विषय मार्गी लागेल, असे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले. 

टॅग्स :washimवाशिम