शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

शेतसा-याची वसुली!

By admin | Updated: April 13, 2016 01:21 IST

दुष्काळ उशिरा जाहीर झाल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांचे नुकसान.

विवेक चांदूरकर /वाशिमदुष्काळग्रस्त भागात कृषी महसुलाची वसुली करण्यावर बंदी असते; मात्र जिल्ह्यात पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्यावरही शासनाने दुष्काळ उशिरा जाहीर केला. त्यामुळे दुष्काळ असल्यावरही जिल्ह्यात १३ लाख ६१ हजार रुपयांच्या कृषी महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे; मात्र शासनाने यावर्षीपासून दुष्काळ जाहीर करण्याकरिता विशेष निकष लावले. दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील सरासरीच्या ५0 टक्के पाऊस व्हायला हवा. तसेच जून व जुलै महिन्यामध्ये ५0 टक्केच पेरणी व्हायला हवी. यासोबतच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी व्हावी. या निकषांमध्ये वाशिम जिल्हा बसत नसल्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला नाही. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र डिसेंबर महिन्यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील काही गावांचा समावेश होता. त्यानंतर न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत दोन महिने जिल्ह्यात उशिरा दुष्काळ जाहीर करण्यात आला. यादरम्यान जिल्ह्यात महसूल वसुली जोमात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून मार्च अखेर सर्वच गावांमध्ये महसूल व शेतसार्‍याची वसुली केली. अमरावती विभागात पाचही जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त वसुली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली. दिलेल्या लक्ष्यापेक्षाही जास्त १0९ टक्के महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात एकूण जमिनीचा शेतसारा १३ लाख ६१ हजार रुपये आहे. या शेतसार्‍याची वसुली करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त अन्य जिल्ह्यांप्रमाणे आधीच दुष्काळ जाहीर झाला असता, तर शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करण्यात आला नसता. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अनेक सुविधा शेतकर्‍यांना तसेच नागरिकांना मिळत असतात; मात्र शासनाने उशिरा दुष्काळ जाहीर केल्यामुळे मिळणार्‍या लाभापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वंचित राहावे लागले.