शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

शेतसा-याची वसुली!

By admin | Updated: April 13, 2016 01:21 IST

दुष्काळ उशिरा जाहीर झाल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांचे नुकसान.

विवेक चांदूरकर /वाशिमदुष्काळग्रस्त भागात कृषी महसुलाची वसुली करण्यावर बंदी असते; मात्र जिल्ह्यात पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्यावरही शासनाने दुष्काळ उशिरा जाहीर केला. त्यामुळे दुष्काळ असल्यावरही जिल्ह्यात १३ लाख ६१ हजार रुपयांच्या कृषी महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे; मात्र शासनाने यावर्षीपासून दुष्काळ जाहीर करण्याकरिता विशेष निकष लावले. दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील सरासरीच्या ५0 टक्के पाऊस व्हायला हवा. तसेच जून व जुलै महिन्यामध्ये ५0 टक्केच पेरणी व्हायला हवी. यासोबतच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी व्हावी. या निकषांमध्ये वाशिम जिल्हा बसत नसल्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला नाही. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र डिसेंबर महिन्यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील काही गावांचा समावेश होता. त्यानंतर न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत दोन महिने जिल्ह्यात उशिरा दुष्काळ जाहीर करण्यात आला. यादरम्यान जिल्ह्यात महसूल वसुली जोमात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून मार्च अखेर सर्वच गावांमध्ये महसूल व शेतसार्‍याची वसुली केली. अमरावती विभागात पाचही जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त वसुली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली. दिलेल्या लक्ष्यापेक्षाही जास्त १0९ टक्के महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात एकूण जमिनीचा शेतसारा १३ लाख ६१ हजार रुपये आहे. या शेतसार्‍याची वसुली करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त अन्य जिल्ह्यांप्रमाणे आधीच दुष्काळ जाहीर झाला असता, तर शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करण्यात आला नसता. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अनेक सुविधा शेतकर्‍यांना तसेच नागरिकांना मिळत असतात; मात्र शासनाने उशिरा दुष्काळ जाहीर केल्यामुळे मिळणार्‍या लाभापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वंचित राहावे लागले.