शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतसा-याची वसुली!

By admin | Updated: April 13, 2016 01:21 IST

दुष्काळ उशिरा जाहीर झाल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांचे नुकसान.

विवेक चांदूरकर /वाशिमदुष्काळग्रस्त भागात कृषी महसुलाची वसुली करण्यावर बंदी असते; मात्र जिल्ह्यात पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्यावरही शासनाने दुष्काळ उशिरा जाहीर केला. त्यामुळे दुष्काळ असल्यावरही जिल्ह्यात १३ लाख ६१ हजार रुपयांच्या कृषी महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे; मात्र शासनाने यावर्षीपासून दुष्काळ जाहीर करण्याकरिता विशेष निकष लावले. दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील सरासरीच्या ५0 टक्के पाऊस व्हायला हवा. तसेच जून व जुलै महिन्यामध्ये ५0 टक्केच पेरणी व्हायला हवी. यासोबतच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी व्हावी. या निकषांमध्ये वाशिम जिल्हा बसत नसल्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला नाही. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र डिसेंबर महिन्यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील काही गावांचा समावेश होता. त्यानंतर न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत दोन महिने जिल्ह्यात उशिरा दुष्काळ जाहीर करण्यात आला. यादरम्यान जिल्ह्यात महसूल वसुली जोमात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून मार्च अखेर सर्वच गावांमध्ये महसूल व शेतसार्‍याची वसुली केली. अमरावती विभागात पाचही जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त वसुली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली. दिलेल्या लक्ष्यापेक्षाही जास्त १0९ टक्के महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात एकूण जमिनीचा शेतसारा १३ लाख ६१ हजार रुपये आहे. या शेतसार्‍याची वसुली करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त अन्य जिल्ह्यांप्रमाणे आधीच दुष्काळ जाहीर झाला असता, तर शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करण्यात आला नसता. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अनेक सुविधा शेतकर्‍यांना तसेच नागरिकांना मिळत असतात; मात्र शासनाने उशिरा दुष्काळ जाहीर केल्यामुळे मिळणार्‍या लाभापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वंचित राहावे लागले.