शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

Maharashtra election 2019 : वाशिम जिल्ह्यात यंदा बंडखोरांमुळे चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:47 IST

तीनही विद्यमान आमदार रिंगणात

वाशिमच्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे चित्र असून वाशीममध्ये शिवसेना तर रिसोडमध्ये काँग्रेसच्या बंडाळीने चुरस निर्माण झाली आहे. युतीमध्ये भाजपकडे वाशिम व कारंजा या जागा आल्या असून शिवसेनेला रिसोड मतदारसंघ देण्यात आला आहे.आघाडीमध्ये रिसोड व वाशिम काँग्रेसला तर कारंजा विधानसभा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. रिसोड मध्ये काँग्रेसचे उमेदवार अमित झनक, काँग्रेसचे बंडखोर अनंतराव देशमुख व शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांच्यामध्ये लढत रंगली आहे. देशमुख-झनक यांच्यामधील सत्तासंघर्ष सर्वश्रृत असल्याने आता देशमुखांसाठी अस्तित्वाची तर झनकांसाठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. वाशिममध्ये भाजपाचे उमेदवार लखन मलिक यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शशीकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिध्दार्थ देवळे यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात शिवसेनेतील मोठा गट हा बंडखोराचे थेट समर्थन करत असल्याने येथे युतीधर्म अडचणीत आला आहे.दूसरीकडे मानापमान नाटयामुळे काँग्रेसचे उमेदवार रजनी राठोड यांच्यासमोर अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न होत आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी विकासकामांचा लेखाजोखा घेऊनच प्रचाराला सुरूवात केली असून या मतदारसंघात पाटणी तसेच राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके, बसपाचे युसूफ पुंजानी यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रिसोडमध्ये दिलीपराव जाधव, वाशिममध्ये डॉ. सिध्दार्थ देवळे व कारंजात डॉ. राम चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे तीनही मतदारसंघामध्ये मतांचे विभाजन निकालावर परिणाम करणारे ठरणार आहे. दरम्यान अमित शाह यांनी मानोरा येथील सभेपूर्वी पोहरादेवीला गेल्यानंतरही रामराव महाराजांची भेट न घेतल्याने बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ आॅक्टोबर रोजी पोहरादेवी येथे धाव घेत संत रामराव महाराजांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा केलेला प्रयत्न जमेची बाजू ठरला आहे.प्रचारातील चर्चेचे मुद्देविधानसभा निवडणुकीत प्रचारात आपण काय करणार हे सांगण्याऐवजी परस्परविरोधी टिकेवरच अधिक भर दिला जात आहे. प्रमुख पक्षाने आपले जाहीरनामे घोषित केलेमात्र ते प्रचारात दिसून येत नसल्याने मतदारांमध्ये चर्चा रंगतांना दिसून येत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी हाच प्रत्येक पक्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तथापि, शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेमके काय करणार हे सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यात कर्जमाफी, पिकविमा, पिक नुकसान, शेतमालाचे हमी दर आदी मुद्दे प्रामुख्याने मांडले जात आहेत.व्हॉटसअ‍ॅपवरील संदेश, फेसबुकवरील पोष्टमधूनही परस्परविरोधी टिकेचा भडीमार व त्यावर येत असलेल्या प्रतिक्रीयांवर चांगलेच वादळ उठत आहे.