शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शिधापत्रिकाधारकांना तीन वर्षांपासून वाटपच नाही

By admin | Updated: December 30, 2014 00:39 IST

पुरवठा विभाग अनभिज्ञ: स्वस्तधान्य दुकानदारांची मनमानी.

मानोरा (वाशिम): तालुक्यातील फुलउमरी येथे काही लाभार्थींना जून २0११ मध्ये शिधापत्रिका देण्यात आल्या; परंतु साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला तरी संबंधित स्वस्तधान्य दुकानदाराने या लाभार्थींना त्यांच्या हक्काचे शिधावाटप एकदाही केलेले नाही. गोरगरिबांना पोटभर अन्न खायला मिळावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. दारिद्रय़ रेषेखालील लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनाही शासनाकडून अमलात आणण्यात आली आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना देण्यातही आले आहेत; परंतु त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीच होत नसल्यामुळे गोरगरीब जनता त्यांच्या हक्कापासून वंचित होत आहे. याचे जिवंत उदाहरण मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे पाहायला मिळते. या छोट्याशा गावातील काही ग्रामस्थांना २0१३ च्या जून महिन्यात पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका देण्यात आल्या होत्या. जयसिंग रुपसिंग चव्हाण यांच्याकडे फुलउमरीचे शिधावाटप आहे, अर्थात या गावचे स्वस्तधान्य दुकानदार ते आहेत. त्यामुळे या दुकानातून सदर शिधापत्रिंकाधारकांना त्यांच्या हक्काचे शिधावाटप नियमितपणे व्हायला हवे; परंतु तसे होत नाही. या ठिकाणच्या काही लाभार्थींना गत साडेतीन वर्षात एकदाही त्यांच्याकडून शिधावाटपच झाले नसल्याची तक्रार शिधापत्रिंकाधारकांनीच केली आहे. काही शिधापत्रिकांना वाटप करण्यात येते; परंतु तेसुद्धा नियमाप्रमाणे करण्यात येत नसल्याचीही तक्रार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दर महिन्याला शासनाकडून मिळणार्‍या धान्याचे वाटप करण्यासाठी येथील स्वस्तधान्य दुकानदाराला त्याच्या क्षेत्रातील शिधापत्रिकांनुसार पुरवठा करण्यात येतो. त्यानंतर लाभार्थी हक्काचे शिधावाटप घेण्यासाठी त्याच्याकडे जातात; परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देऊन या लाभार्थींची बोळवण करतो. संबंधित विभागाकडून तुमच्या वाट्याचा मालच मिळाला नाही, अशी उत्तरे तो देतो. त्याच्या मनमानी कारभाराला लाभार्थी कंटाळून गेले असून, या स्वस्तधान्य दुकानदाराचा परवानाच रद्द होण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.