शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रमाबाई आंबेडकर कॉलनी विविध समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:44 IST

येथील गट सर्व्हे क्र. १३५ मध्ये अतिक्रमण जागेवर गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ३५ घरांची वस्ती आहे. ...

येथील गट सर्व्हे क्र. १३५ मध्ये अतिक्रमण जागेवर गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ३५ घरांची वस्ती आहे. यात जवळपास ६० ते ७० रहिवासी राहत आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांनी या अतिक्रमण जागेवर लेआउट पाडून त्या जागा आमच्या नावे करण्यात याव्यात, येण्या-जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही प्रतिसाद शासनाकडून मिळाला नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन दिले आहे.

याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना एक किमी अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यामुळे येथे हातपंपाची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. ही वस्ती गावाबाहेर असून, या वस्तीच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपी वाढली आहे. त्यामुळे विंचू, साप, गोम यांची भीती येथे राहणाऱ्या नागरिकांना वाटत आहे. याविषयी अनेकदा ग्रामपंचायत धनज बु येथील सरपंच, तहसीलदार कारंजा, उपविभागीय अधिकारी कारंजा, गटविकास अधिकारी कारंजा, पंचायत समिती सभापती कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम तसेच आमदार पाटणी यांना निवेदन दिले आहे. याकडे संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी माणगी येथील रहिवासी करत आहेत.

....................

आम्हा अतिक्रमणधारकांना ही जागा नावावर करून द्यावी तसेच येथे रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावर लाइट या आमच्या समस्या असून, त्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी अनेकदा शासनाकडे करूनसुद्धा आम्हाला अद्यापपर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही.

- विशाल अघमे,

रहिवासी दलितवस्ती रमाबाई आंबेडकर कॉलनी, धनज बु.

-------------

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अनेक समस्यांनी त्रस्त झालो असून, शासनाकडे आमच्या या समस्यांविषयी कित्येकदा माहिती देऊनसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही.

- विपुल घणघावकार

राहिवासी, दलितवस्ती रमाबाई आंबेडकर कॉलनी, धनज बु.