शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा मुक्काम वाढला

By admin | Updated: September 1, 2014 00:43 IST

वाशिम जिल्हय़ात सलग तिसर्‍या दिवशीही पाऊस : पिकांना संजीवणी, जलपातळीत होतेय वाढ.

वाशिम : यंदा दोन महिने उसंत घेणारा पाऊस या आठवड्यात जिल्हावासीयांवर चांगलाच मेहेरबान झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून विविध ठिकाणी बरसणार्‍या पावसाने जिल्हय़ातील मुक्काम वाढविला आहे. या पावसाचा पिकांना फायदा होण्याबरोबरच जलपातळीत वाढ होणार आहे.गत वर्षी सतत बरसून शेतकर्‍यांना अडचणीत आणणार्‍या पावसाने यंदा मात्र चांगलीच उसंत घेतली होती. मृग, रोहिणी या नक्षत्रात नावापुरताच पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. मृगाच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांनी वेळेवरच पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जून, जुलै या दोन महिने कोरडेच गेल्यानंतर ऑगष्ट महिना अर्धा उलटत आला तरी, पावसाची सरासरी अध्र्यापर्यंंत आली नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचा घसा कोरडा पडू लागला होता. जिल्हय़ातील १0८ गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. शासनाने कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या राज्यभरातील तालुक्यांत वाशिम जिल्हय़ातील वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या चार तालुक्यांचा समावेश होता. पावसाअभावी पिके सुकू लागली, तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करू लागला असताना या आठवड्यात जिल्हाभरात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. शुक्रवारपासून बरसणार्‍या पावसामुळे जनजीवन प्रभावित होत असले तरी, या पावसामुळे पिकांना चांगलाच आधार मिळाला असून, पिण्याच्या पाण्याची समस्या थोडीफार कमी झाली आहे. जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होणार आहे. अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्रातील किनारी भागातील केरळपर्यंंत, तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड परिसरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाड्यासह विदर्भातील काही भगांत पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले, येत्या दोन दिवसांत जिल्हय़ात जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. * गत तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा फायदा सोयाबीन, कपाशी, तूर, या पिकांना होणार असून, जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होणार आहे. या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे जिल्हय़ातील जलसाठय़ात काही प्रमाणात वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याची समस्या थोडीफार कमी होण्याची शक्यता आहे. रिपरिप पावसामुळे पिकांवर रोगराईचे संकट वाढणार असल्याचेही बोलल्या जात आहे.