शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पावसाने पिकांना मिळाली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसाने पिकास संजीवनी मिळाली आहे. तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून ...

तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसाने पिकास संजीवनी मिळाली आहे. तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीपिके प्रभावित झाली होती. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही विजेचा खोळंबा येत पावसाअभावी सोयाबीन पीक पूर्णत: वाया जाणार असल्याचे दिसत होते. कापूस व सोयाबीन पिकांवर विविध कीड व अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकरी महागात महाग कीटकनाशकाची फवारणी करून, पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाच, पावसाने दडी मारल्याने मागील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला होता. गेल्या दोन, तीन दिवसांपासून तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्याने पिकास संजीवनी मिळाली आहे, तसेच अनेक सिंचन प्रकल्पातही पावसामुळे जलसाठा वाढला आहे.

.................

मानाेरा तालुक्यात शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

मानोरा : तालुक्यात फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला मागील दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला पाऊस कमी-अधिक प्रमाणात बरसत असल्याने जीवनदान मिळाले आहे. त्रेपन्न हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांत सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सोयाबीन या पिकाला मागील पंधरा दिवसांपासून पाऊस दडी मारून बसल्याने फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीन पीक अनेक ठिकाणी कोमेजले होते. मानोरा तालुक्यात खरीप हंगामात पेरण्यात आलेल्या एकूण बियाण्यापैकी ३१ हजार हेक्टरच्या जवळपास सोयाबीन या पिकाच्या बियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. मागील पंधरवड्यातील अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झालेले असल्याने सोयाबीन आणि इतरही पिके आता बहरात आहे. निसर्गाने साथ दिल्यास मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी सोयाबीनचे विक्रमी पीक तालुक्यात होण्याची आस शेतकरी लावून बसलेले आहेत. तालुक्यातील डौलाने उभे असलेल्या आणि चांगली वाढ झालेल्या सोयाबीनच्या पिकावर काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाल्याने कीड नाशकांची फवारणी शेतकऱ्यांनाद्वारा करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिवाळीपश्चात सोयाबीनच्या किमती गगनाला भिडल्याने शेत शिवारात डौलाने उभ्या असलेल्या सोयाबीनमुळे या वर्षी चांगले उत्पन्न होण्याचे हिरवी स्वप्ने तालुक्यातील शेतकरी बांधवांना आतापासून पडत आहेत.