शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पश्चिम वऱ्हाडातील पावसाचे प्रमाण तुरीसाठी लाभदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 14:09 IST

वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील  दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील  दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. पश्चिम विदर्भातील तिन्ही जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीचा पेरा सर्वाधिक असून, पावसाचे प्रमाण पाहता या पिकाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या तिन्ही जिल्ह्यात मिळून १ लाख ९५ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे.पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडला आहे. त्यातच आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जोरदार पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन, मुग, उडिद या पिकांना फटका बसला; परंतु खरीपातील दिर्घकालीन पिके असलेल्या तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. आता मुग आणि उडिद ही पिके काढणीवर आली आहेत, तर सोयाबीनचे पीकही महिनाभरातच काढणीवर येणार आहे. या पिकांतच आंतर पिक म्हणून तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही पिके काढल्यानंतर जमिनीतील ओलावा तुरीच्या वाढीसाठी पोषक ठरून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. तथापि, पुढे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यास या पिकाला मारकही ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८१४९४, वाशिम जिल्ह्यात ५९७८०, तर अकोला जिल्ह्यातील ५४५३५ हेक्टर मिळून तिन्ही जिल्ह्यात १ लाख ९५ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी यंदा झाली असून. सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६४ टक्के, वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर अकोला जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस पडल्याने तुरीच्या पिकाला मोठा फायदा होणार आहे.ज्या जमिनीची पाणीधारण क्षमता अधिक असते त्या जमिनीवरील तुरीच्या पिकाला जास्त पावसाचा धोका असतो. तुरीची पाने पिवळी पडून उत्पादनात घट येण्याची शक्यता असते; परंतु आपल्याकडील जमिनीचा प्रकार पाहता आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसाचा तुरीला फायदा होऊन उत्पादनात काही प्रमाणात वाढ होऊ शकणार आहे.-आर. एस. डवरेकृषी शास्त्रज्ञकृषी विज्ञान केंद्र करडा (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती