शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
6
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
7
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
8
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
9
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
10
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
11
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
12
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
13
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
14
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
15
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
16
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
17
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
18
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
19
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
20
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स

नादुरुस्त रोहित्रामुळे रब्बी हंगाम धोक्यात

By admin | Updated: October 27, 2014 00:37 IST

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त.

तळप बु. (वाशिम): विविध संकटांचा सामना करणार्‍या शेतकरी वर्गावर निसर्गाप्रमाणेच वीज वितरणचीही अवकृपा होत असून, तळप बु. येथील अनेक दिवसांपासून निकामी झालेल्या विद्युत रोहित्रांमुळे रब्बीचा हंगामही धोक्यात आला आहे. यंदा कमी पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर रोगराईमुळे पिकांवर संकट आल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके बुडाली, तर सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट आल्याने शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. आता रब्बीच्या हंगामात खरिपाची कसर भरून काढण्याची तयारी शेतकर्‍यांनी चालविली आहे; परंतु रब्बीच्या पिकांचे सिंचन करण्यासाठी पाण्याची सोय असली तरी, नियमित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. मानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी रोहित्र निकामी झाले असून, त्यामधील थोड्याशा बिघाडामुळे वीजपुरवठा कित्येक तास खंडित होतो आणि पिकांना पाणी देणे शेतकर्‍यांसाठी शक्य होत नाही. या ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आले नाहीत, तर खरिपानंतर यंदाचा रब्बी हंगामही बुडण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. खात्रीलायक माहितीनुसार मानोरा तालुक्यातील जवळपास ४0 गावांतील विद्युत रोहित्र निकामी झाले आहेत किंवा जळालेले आहेत. परिसरातील तळप, कार्ली या गावांतही हीच परिस्थिती आहे. त्यातच वीज वितरणकडून मोठय़ा प्रमाणात भारनियमनही करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना विजेची आवश्यकता नसते. त्यावेळी वीज वितरणकडून भारनियमन करण्यात येत नाही. शेती सिंचनासाठी विजेची आवश्यकता असते. त्यावेळेस मात्र मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येते. यावर्षी शेतकर्‍यांचा खरीप हंगाम अत्यल्प पावसामुळे पार बुडाला. या हंगामात लावलेला खर्चही शेतकर्‍यांना मिळू शकला नाही.