शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त रोहित्रामुळे रब्बी हंगाम धोक्यात

By admin | Updated: October 27, 2014 00:37 IST

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त.

तळप बु. (वाशिम): विविध संकटांचा सामना करणार्‍या शेतकरी वर्गावर निसर्गाप्रमाणेच वीज वितरणचीही अवकृपा होत असून, तळप बु. येथील अनेक दिवसांपासून निकामी झालेल्या विद्युत रोहित्रांमुळे रब्बीचा हंगामही धोक्यात आला आहे. यंदा कमी पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर रोगराईमुळे पिकांवर संकट आल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके बुडाली, तर सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट आल्याने शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. आता रब्बीच्या हंगामात खरिपाची कसर भरून काढण्याची तयारी शेतकर्‍यांनी चालविली आहे; परंतु रब्बीच्या पिकांचे सिंचन करण्यासाठी पाण्याची सोय असली तरी, नियमित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. मानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी रोहित्र निकामी झाले असून, त्यामधील थोड्याशा बिघाडामुळे वीजपुरवठा कित्येक तास खंडित होतो आणि पिकांना पाणी देणे शेतकर्‍यांसाठी शक्य होत नाही. या ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आले नाहीत, तर खरिपानंतर यंदाचा रब्बी हंगामही बुडण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. खात्रीलायक माहितीनुसार मानोरा तालुक्यातील जवळपास ४0 गावांतील विद्युत रोहित्र निकामी झाले आहेत किंवा जळालेले आहेत. परिसरातील तळप, कार्ली या गावांतही हीच परिस्थिती आहे. त्यातच वीज वितरणकडून मोठय़ा प्रमाणात भारनियमनही करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना विजेची आवश्यकता नसते. त्यावेळी वीज वितरणकडून भारनियमन करण्यात येत नाही. शेती सिंचनासाठी विजेची आवश्यकता असते. त्यावेळेस मात्र मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येते. यावर्षी शेतकर्‍यांचा खरीप हंगाम अत्यल्प पावसामुळे पार बुडाला. या हंगामात लावलेला खर्चही शेतकर्‍यांना मिळू शकला नाही.