शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगाम धोक्यात

By admin | Updated: November 6, 2016 19:36 IST

यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बीच्या हंगामात सिंचनाला आधार मिळणार असला तरी, विजेच्या विविध समस्यांमुळे हा हंगाम संकटात सापल्याची स्थिती जिल्ह्यात दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बीच्या हंगामात सिंचनाला आधार मिळणार असला तरी, विजेच्या विविध समस्यांमुळे हा हंगाम संकटात सापल्याची स्थिती जिल्ह्यात दिसत आहे. 
मागील तीन वर्षांत प्रथमच चांगला पाऊस पडला. जिल्हाभरातील जलस्त्रोत काठोकाठ भरले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही वाढली आहे. पण विज वितरणकडून होणारे अघोषित भारनियमन, विविध कारणांमुळे सतत खंडीत होणारा विज पुरवठा, तसेच कूचकामी रोहित्रांमुळे शेतकऱ्यांना पिके जगविणेच कठीण झाले आहे. मुबलक पाणी उपलब्ध असतानाही शेतकरी त्याचा उपयोग विजेअभावी करू शकत नाहीत. मागील तीन वर्षांत याच कारणांमुळे दुष्काळाची झळ अधिक तीव्र झाली होती, कारण थोडथोडके पाणी असल्याने त्या आधारे पिके  तगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना विज वितरणच्या हलगर्जीमुळे अडथळा आला होता. परिणाम तीन वर्षांत दाहक उन्हाच्या फटक्याने उभी णही पोषक पिके डोंळ्यादेखत करपत असल्याचे शेतकºयांनी पाहिले. आता यंदा तीन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वातावरअसून, कृषी विभागाच्यावतीने तब्बल १ लाख ३० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली. हे प्रमाण गतवर्षी पेक्षा दीडपट आहे; परंतु विज वितरणच्या हेळसांडीमुळे हा हंगाम विज पुरवठ्या अभावी संकटात सापल्याचे दिसत आहे. 
वाशिम जिल्ह्यात रोहित्र जळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. दररोज कुठल्या तरी गावात एक रोहित्र जळून निकामी होत आहेच. यामुळे संबंधित गाव किंवा शेतशिवारातील विज पुरवठा खंडीत होतो. हा विज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रोहित्र बसविणे गरजेचे आहे; परंतु विज वितरणकडे पुरेशा प्रमाणात रोहित्रच उपलबध नाहीत. सद्यस्थितीत जिल्ह्यात दीडशेच्यावर रोहित्र बिघडल्यामुळे कुठे गाव अंधारात आहे, तर कुठे शेतकऱ्यांचे सिंचन रखडले आहे; परंतु ही समस्या दूर करण्यासाठी विज वितरणकडे रोहित्रच उपलब्ध नाहीत. या संदर्भात अधिकारी कर्मचारीही फारसे गंभीर नसल्याने जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत