शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:31 IST

आॅफलाईन पद्धतीने खत विक्री झाल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राविरूद्ध कारवाईचा इशाराही कृषी विभागाने दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगाम तोंडावर आला असून, कृषी विभागाने १.११ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान बियाणे, खतांची टंचाई भासू नये म्हणून पुरेशा प्रमाणात साठाही उपलब्ध करण्यात येत आहे. आॅफलाईन पद्धतीने खत विक्री झाल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राविरूद्ध कारवाईचा इशाराही कृषी विभागाने दिला.खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेले शेतकऱ्यांची सर्व भीस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणाºया शेतकऱ्यांसमोर अनियमित वीजपुरवठा, नादुरूस्त विद्युत रोहित्रामुळे नवीन संकट उभे ठाकण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविण्यात येत आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवडी खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकºयांवर ओढवली आहे. आता शेतकºयांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख ११ हजार ९०० हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७० हजार हेक्टरवर हरभºयाची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.त्याखालोखाल गहू, रब्बी ज्वारी, करडई, मका आदींचा पेरा राहिल. रासायनिक खतांची टंचाई भासू नये म्हणून जिल्ह्यासाठी ४३ हजार ९५० मे.टन खत मंजूर झाले आहे.यावर्षी जास्त पाऊस झाल्याने रब्बी हंगामात सिंचन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सिंचनात व्यत्यय नको म्हणून महावितरणने आतापासूनच नादुरूस्त विद्युत रोहित्र बदलून देणे, वीजपुरवठा सलग राहिल याची दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.आॅनलाईन पद्धतीने खत विक्री करावी - बंडगरशेतकºयांची कोणत्याही प्रकारे गैरसोय, फसवणूक होऊ नये म्हणून कृषी सेवा केंद्र संचालकांनी रासायनिक खताची विक्री ही ई-पॉस मशिनवरून करावी. आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरूद्ध योग्य ती कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व्ही.एस. बंडगर यांनी दिला.रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले असून १.११ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांची गैरसोय टळेल.- व्ही.एस. बंडगरकृषी विकास अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती