शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये साडे नऊ हजार शेतकºयांना रब्बी पिक विमा

By admin | Updated: March 20, 2017 13:36 IST

जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर

वाशिम: गतवर्षी अर्थात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत, राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई बुधवार, १ मार्च रोजी मंजूर झाली आहे. ज्यामध्ये हरभरा, उन्हाळी भुईमूग व गहु या अधिसूचित पिकांकरिता जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर झाल्याची माहितीे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली़रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती. यापैकी हरभरा व गहु पिक घेणाऱ्या मालेगाव तालुक्यातील अनुक्रमे ७२६ व ३९९ या प्रमाणे १,१२२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी २९ लाख ५० हजार ४५५ रूपये, तर गहु पिकासाठी ४२ लाख ५९ हजार ९७५ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ तसेच मंगरूळपीर तालुक्यातील एकूण १२०० शेतकऱ्यांनी हरभरा व ४५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाचा विमा उतरविला होता़ या तालुक्यातील शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी १२ लाख ७२ हजार ६५४ रूपये, तर गहु पिकासाठी १ लाख ९२३ रूपयाची भरपाइ मंजूर झाली आहे़ मानोरा तालुक्यातील एकूण २४८ शेतकऱ्यांनी हरभरा तर ४६२ शेतकऱ्यांनी गहु पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते़ त्यांना हरभरा पिकापोटी ८ लाख ७२ हजार ७१६ रूपये, तर गहु पिकासाठी १० लाख ९५ हजार २४० रूपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे़ रिसोड तालुक्यातील एकूण ३३८५ शेतकऱ्यांनी हरभरा व ६८८ शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी विम्याचे सुरक्षा कवच घेतले होते़ त्यातील हरभरा पिकापोटी ३ कोटी ३६ लाख ४८ हजार ३५०, तर गहु पिकासाठी ३५ लाख ६९ हजार ४०३ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ वाशीम तालुक्यातील एकूण ८३६ शेतकऱ्यांनी चना, तर ५५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ त्यांना चना पिकाबद्दल ५९ लाख ९९ हजार २६८ रूपये, तर गहु पिकासाठी ७८ लाख ८८ हजार रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ या शिवाय कारंजा तालुक्यातील एकूण ५४० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात या योजनेतंर्गत गव्हाचा विमा उतरविला होता़ त्यांना ७ लाख २९ हजार ७३८ रूपयाचा विमा मंजूर झाला आहे़ दरम्यान, भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाईची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती मिळाली आहे़