शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये साडे नऊ हजार शेतकºयांना रब्बी पिक विमा

By admin | Updated: March 20, 2017 13:36 IST

जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर

वाशिम: गतवर्षी अर्थात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत, राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई बुधवार, १ मार्च रोजी मंजूर झाली आहे. ज्यामध्ये हरभरा, उन्हाळी भुईमूग व गहु या अधिसूचित पिकांकरिता जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर झाल्याची माहितीे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली़रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती. यापैकी हरभरा व गहु पिक घेणाऱ्या मालेगाव तालुक्यातील अनुक्रमे ७२६ व ३९९ या प्रमाणे १,१२२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी २९ लाख ५० हजार ४५५ रूपये, तर गहु पिकासाठी ४२ लाख ५९ हजार ९७५ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ तसेच मंगरूळपीर तालुक्यातील एकूण १२०० शेतकऱ्यांनी हरभरा व ४५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाचा विमा उतरविला होता़ या तालुक्यातील शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी १२ लाख ७२ हजार ६५४ रूपये, तर गहु पिकासाठी १ लाख ९२३ रूपयाची भरपाइ मंजूर झाली आहे़ मानोरा तालुक्यातील एकूण २४८ शेतकऱ्यांनी हरभरा तर ४६२ शेतकऱ्यांनी गहु पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते़ त्यांना हरभरा पिकापोटी ८ लाख ७२ हजार ७१६ रूपये, तर गहु पिकासाठी १० लाख ९५ हजार २४० रूपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे़ रिसोड तालुक्यातील एकूण ३३८५ शेतकऱ्यांनी हरभरा व ६८८ शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी विम्याचे सुरक्षा कवच घेतले होते़ त्यातील हरभरा पिकापोटी ३ कोटी ३६ लाख ४८ हजार ३५०, तर गहु पिकासाठी ३५ लाख ६९ हजार ४०३ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ वाशीम तालुक्यातील एकूण ८३६ शेतकऱ्यांनी चना, तर ५५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ त्यांना चना पिकाबद्दल ५९ लाख ९९ हजार २६८ रूपये, तर गहु पिकासाठी ७८ लाख ८८ हजार रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ या शिवाय कारंजा तालुक्यातील एकूण ५४० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात या योजनेतंर्गत गव्हाचा विमा उतरविला होता़ त्यांना ७ लाख २९ हजार ७३८ रूपयाचा विमा मंजूर झाला आहे़ दरम्यान, भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाईची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती मिळाली आहे़