शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

वाशिममध्ये साडे नऊ हजार शेतकºयांना रब्बी पिक विमा

By admin | Updated: March 20, 2017 13:36 IST

जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर

वाशिम: गतवर्षी अर्थात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत, राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई बुधवार, १ मार्च रोजी मंजूर झाली आहे. ज्यामध्ये हरभरा, उन्हाळी भुईमूग व गहु या अधिसूचित पिकांकरिता जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर झाल्याची माहितीे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली़रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती. यापैकी हरभरा व गहु पिक घेणाऱ्या मालेगाव तालुक्यातील अनुक्रमे ७२६ व ३९९ या प्रमाणे १,१२२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी २९ लाख ५० हजार ४५५ रूपये, तर गहु पिकासाठी ४२ लाख ५९ हजार ९७५ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ तसेच मंगरूळपीर तालुक्यातील एकूण १२०० शेतकऱ्यांनी हरभरा व ४५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाचा विमा उतरविला होता़ या तालुक्यातील शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी १२ लाख ७२ हजार ६५४ रूपये, तर गहु पिकासाठी १ लाख ९२३ रूपयाची भरपाइ मंजूर झाली आहे़ मानोरा तालुक्यातील एकूण २४८ शेतकऱ्यांनी हरभरा तर ४६२ शेतकऱ्यांनी गहु पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते़ त्यांना हरभरा पिकापोटी ८ लाख ७२ हजार ७१६ रूपये, तर गहु पिकासाठी १० लाख ९५ हजार २४० रूपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे़ रिसोड तालुक्यातील एकूण ३३८५ शेतकऱ्यांनी हरभरा व ६८८ शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी विम्याचे सुरक्षा कवच घेतले होते़ त्यातील हरभरा पिकापोटी ३ कोटी ३६ लाख ४८ हजार ३५०, तर गहु पिकासाठी ३५ लाख ६९ हजार ४०३ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ वाशीम तालुक्यातील एकूण ८३६ शेतकऱ्यांनी चना, तर ५५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ त्यांना चना पिकाबद्दल ५९ लाख ९९ हजार २६८ रूपये, तर गहु पिकासाठी ७८ लाख ८८ हजार रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ या शिवाय कारंजा तालुक्यातील एकूण ५४० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात या योजनेतंर्गत गव्हाचा विमा उतरविला होता़ त्यांना ७ लाख २९ हजार ७३८ रूपयाचा विमा मंजूर झाला आहे़ दरम्यान, भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाईची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती मिळाली आहे़