शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोटेशन भरलेल्या शेतकर्‍यांना पाच वर्षांपासून वीज जोडणीची प्रतिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:01 IST

अनेक शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळाली नाही. याची प्रकाराची दखल संबंधित शेतकर्‍यांना त्वरीत वीज जोडणी न दिल्यास शेतकर्‍यांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदनाव्दारे दिला आहे. 

ठळक मुद्देमालेगाव तालुक्यातील प्रकारशेतकरी संघटनेचा उपोषणाचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम):  शेतात वीजजोडणीसाठी महाविरणकडे पाच वर्षांपूर्वी कोटेशनची रक्कम भरूनही तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळाली नाही. याची प्रकाराची दखल संबंधित शेतकर्‍यांना त्वरीत वीज जोडणी न दिल्यास शेतकर्‍यांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.  मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी कृषीपंपाकरिता वीज जोडणी मिळावी म्हणून महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाकडे रितसर अर्ज सादर करून कोटेशन भरले आहे; परंतु पाच वर्षे उलटली तरी, या शेतकर्‍यांना अद्यापही वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकरी वीज जोडणीसाठी वारंवार महावितरण कार्यालयाच्या वा-याकरून गलित गात्र झाले असतानाही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या समस्येबाबत शेतकरी संघटनेने आक्र मक पावित्रा घेतला आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटेनेच जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी मालेगावच्या तहसीलदारांकडे शेतकर्‍यांसह निवेदन सादर करून महावितरणच्या मालेगाव उपविभागाने येत्या आठवडा भरातकोटेशन भरलेल्या शेतकर्‍यांची वीज जोडणी द्यावी, अन्यथा सर्वच संबंधित शेतकºयांसह उपोषण करण्यात येईल,असा इशारा  दिला आहे. दरम्यान, पांगरा बंदीचे शेतकरी दत्तराव पर्वतराव घुगे यांना केवळ ३८ युनिट वापराच्या देयकापोटी तब्बल ३ हजार ५१० रुपये आकारणी कशी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.