शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारिप-बमसं आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 14:16 IST

वाशिम : सध्या शेतकरी नानाविध संकटातून जात असून, वाढते वीज भारनियमन त्यात अधिकच भर घालत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या शेतकरी नानाविध संकटातून जात असून, वाढते वीज भारनियमन त्यात अधिकच भर घालत आहे. शेतकºयांना दिलासा म्हणून वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा यासह अन्य प्रलंबित समस्या निकाली काढण्याची मागणी भारिप-बमसंच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली आहे. अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची सुधारित हंगामी पैसेवारी वस्तुस्थितीला धरून काढणे अपेक्षीत आहे. शेतकºयांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया विद्यमान सरकारकडून शेतकºयांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे, असा आरोप भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी निवेदनाद्वारे केला. शेतमालाला समाधानकारक हमीभाव नाही, कर्जमाफी ही तांत्रिक बाबीत अडकत आहे, प्रलंबित कृषीपंप जोडणीचा प्रश्न निकाली निघाला नाही, गतवर्षीचे शेतमालाचे चुकारे अद्याप मिळालेले नाहीत, अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिसरात भारनियमनाव्यतिरिक्त वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. एकंदरीत शेतकºयांची अवस्था बिकट असून, शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने शेतकºयांच्या व्यथा जाणाव्या, शेतकºयांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावे, वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी निवेदनाद्वारे दिला.

टॅग्स :washimवाशिमBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ