शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू - आनंद चरखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 19:04 IST

व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कोरोनाबाधितांची संख्या वाशिम शहराप्रमाणेच जिल्ह्यातही झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाशिम शहरात १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान  व्यापारी मंडळाने जनता कर्फ्यूची हाक दिली आहे. जनता कर्फ्यू, व्यापाºयांची भूमिका, आगामी काळातील संकल्प, रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट यासंदर्भात व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू पाळला जात असल्याचे ते म्हणाले.

जनता कर्फ्यूमुळे कोरोनाची साखळी तुटणार, असे आपणाला वाटते का?वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाजारपेठेत नागरिकांची गर्दीही होत होती. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असल्याने शहरातील सर्व व्यापाºयांनी एकत्र येत जनता कर्फ्यूसंदर्भात दोन दिवस बैठक घेतली. सर्वांच्या सहमतीने व सहकार्यातून १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात आहे. १७ व १८ सप्टेंबर रोजीच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार या दोन दिवसात पूर्वीच्या दैनंदिन अहवालाच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते. 

जनता कर्फ्यूदरम्यान काही दुकाने उघडी राहतात, याबाबत काय सांगाल?जनता कर्फ्यूबाबत सर्वांनी दुकाने बंद ठेवावी, असे सर्वसंमतीने ठरले आहे. शहरात सकाळ व सायंकाळी व्यापारी मंडळाचे पदाधिकारी फिरून ज्यांची दुकाने उघडी दिसतात, त्यांना दुकान बंद करण्यासंदर्भात विनंती केली जाते.त्यानंतर दुकान बंद करण्यात येते. २२ सप्टेंबरपर्यंत सर्व व्यापाºयांनी संयम पाळून दुकाने बंद ठेवावी.

२२ सप्टेंबरनंतर व्यापारी मंडळाची पुढील भूमिका काय राहिल? बाजारपेठेतील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न म्हणून २२ सप्टेंबरनंतर दुकाने सुरू ठेवण्याची वेळ कमी करता येईल का या अनुषंगाने दोन्ही व्यापारी मंडळातर्फे शहरातील सर्व व्यापाºयांशी चर्चा केली जाईल. सर्वांच्या संमतीने दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेसंदर्भात निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहिल.

रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टबाबत आपली भूमिका काय राहिल?कोरोनाचे वेळीच निदान व्हावे याकरीता कारंजा शहरात प्रशासनाने व्यापाºयांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. वाशिम शहरात जिल्हा प्रशासनाने व्यापारी, व्यावसायिकांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाच तर त्याला व्यापारी युवा मंडळाचे निश्चितच सकारात्मक सहकार्य राहिल, यात शंका नाही. कोरोनाबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाशिम शहरात २२ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू असून ग्रामीण भागातील नागरिकांनी २२ सप्टेंबरपर्यंत शहरातील बाजारपेठेत येणे टाळावे. व्यापाºयांनीदेखील आणखी संयम पाळून तीन दिवस दुकाने कडकडीत बंद ठेवावी. नागरिकांनीदेखील शहरात विनाकारण न फिरता, अत्यावश्यक काम नसेल तर घरातच राहून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याप्रमाणे स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्यही जपण्याचा प्रयत्न करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमinterviewमुलाखत