शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वच्छ सर्वेक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांत जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:16 IST

जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड ऐच्छिक पद्धतीने करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम वाशिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत सदर सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी गुणांकन पद्धती केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला असून सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २  आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड ऐच्छिक पद्धतीने करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,  प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजारतळ अशा विविध सार्वजनिक ठिकाणांची तपासणी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये करण्यात येणार आहे. तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८’ (एसएसजी-१८) या अ‍ॅपवर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) संदर्भात प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. या प्रतिक्रियांची केंद्र सरकार स्तरावर घेतल्या जाणार आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, आदींनी या अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना , जिल्हा स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान