शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

स्वच्छ सर्वेक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांत जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:16 IST

जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड ऐच्छिक पद्धतीने करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम वाशिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत सदर सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी गुणांकन पद्धती केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला असून सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २  आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड ऐच्छिक पद्धतीने करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,  प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजारतळ अशा विविध सार्वजनिक ठिकाणांची तपासणी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये करण्यात येणार आहे. तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८’ (एसएसजी-१८) या अ‍ॅपवर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) संदर्भात प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. या प्रतिक्रियांची केंद्र सरकार स्तरावर घेतल्या जाणार आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, आदींनी या अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना , जिल्हा स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान