शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:16 IST

वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक  पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते.  दरम्यान, अपुर्‍या पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी  शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत  ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरीत्या जनजागृती केली जात  असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे‘मजिप्रा’कडून पाणी बचतीचे प्रयत्नग्रामस्थांकडूनही मिळते सहकार्यचाहूल टंचाईची; काटकसर पाण्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक  पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते.  दरम्यान, अपुर्‍या पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी  शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत  ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरीत्या जनजागृती केली जात  असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील बंद पडलेल्या  १0 पाणी पुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी भरीव निधी  मंजूर झाला. त्यातून सध्या प्रथम प्राधान्याने योजना पूर्ण  करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच ज्या  प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुस्थितीत आहेत, त्याद्वारे ग्रामीण  जनतेला पाणी पुरवठा केला जात असून, गरज असेल तरच  पाणी घ्या, पाण्याचा अपव्यय टाळा, गावातील विहिरी, हातपंपांना  पाणी असल्यास आधी त्याचा वापर करा, अशा पद्धतीने ‘मजि प्रा’कडून जिल्ह्यातील गावकर्‍यांचे उद्बोधन केले जात असून  त्यास सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. 

यावर्षी पर्जन्यमान असमाधानकारक राहिल्याने सद्य:स्थितीत  जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांच्या पाणीपातळीने निच्चांकी स्तर  गाठला आहे. ही बाब लक्षात घेऊन आतापासूनच पाणी  पुरवठय़ाचे चोख नियोजन केले जात असून, गावागावात  प्रभावीरीत्या जनजागृती केली जात आहे. गावकर्‍यांमधून देखील  त्यास प्रतिसाद मिळत आहे.- के. के. जीवनेकार्यकारी अभियंता, मजिप्रा.