शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

आचारसंहितेत अडकले ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे प्रस्ताव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:47 IST

Washim News ६१ आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त ३२२ प्रस्ताव निकाली निघू शकले नाहीत.

ठळक मुद्देआचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्याने आचारसंहिता संपुष्टात येईल.

वाशिम : सुरूवातीला अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्याने ६१ आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त ३२२ प्रस्ताव निकाली निघू शकले नाहीत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नस कृती कार्यक्रमंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकपिंर्यंत शासकिय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यानुसार रिक्त असलेल्या ६१ ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी २ ते ११ नोव्हेंबर २०२० या दरम्यान इच्छूकांकडून प्रस्ताव (अर्ज) मागविण्यात आले होते. आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही झळकली होती. एकूण ३२२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. एका केंद्राकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा घेणे, लेखी व तोंडी परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास उच्च शैक्षणिक अर्हता किंवा अधिक वय किंवा यापेक्षा अन्य योग्य पयार्याचे आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. दरम्यान, सुरूवातीला अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ आणि त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्याने निवड प्रक्रिया राबविता आली नाही. ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्याने आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिम