शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

मध्यम प्रकल्पांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रखडला!

By admin | Updated: December 31, 2014 01:09 IST

उंची वाढल्यास पाणीटंचाई होणार दूर : सिंचनाचीही होणार व्यवस्था.

नंदकिशोर नारे / वाशिम:  जिल्हय़ात तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी एकबुर्जी व अडाण या प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असून, लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा केला; मात्र सदर प्रस्ताव रखडलेले आहेत. या प्रकल्पांची उंची वाढविल्यास बर्‍याच अंशी पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न निकाली लागू शकतो. वाशिम जिल्हय़ात एकही मोठा प्रकल्प नाही. तीन मध्यम प्रकल्प असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, मालेगाव तालुक्यातील सोनल व कारंजा तालुक्यातील अडाण या प्रकल्पाचा समावेश आहे. यासह १00 लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला एकबुर्जी धरणामधून पाणीपुरवठा केल्या जातो; परंतु एकबुर्जी धरणाची उंची कमी असल्याकारणाने शहराला आवश्यक व मुलबक पाणीपुरवठा होत नाही. धरणाच्या कमी उंचीमुळे शेतीच्या सिंचनाकरितासुद्धा आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. एकबुर्जी उंची वाढविण्याची मागणी शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सदर धरणाची उंची वाढल्यास शहरातील पाणी समस्या तर दूर होईलच शिवाय शेतकर्‍यांना सिंचानाकरिता व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील उद्योगांना पाणीपुरवठा होऊन मागासलेल्या जिल्हय़ाच्या विकासास चालना मिळेल. तसेच कारंजा तालुक्यातील अडाण धरणाची उंची वाढण्यासंदर्भात जनतेची बर्‍याच दिवसांची मागणी आहे; मात्र ही मागणीही अनेक दिवसांपासून रखडलेली आहे. अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यामध्ये असला तरी या प्रकल्पातील पाण्याचा लाभ शेजारील तालुक्याला होतो. प्रकल्पाशेजारी असलेल्या २२ गावांमधील लोकांची लिफ्ट एरिगेशनला चालना मिळण्याकरिता या प्रकल्पाचीही वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. सदरच्या प्रकल्पाची उंची वाढवासी व लिफ्ट एरिगेशनच फायदा शेजारच्या तालुक्यासह या तालुक्यातील २२ गावांमधील लोकांना मिळावा याकरिता खा. भावना गवळी यांनी धरणाच्या भिंतीवर आंदोलन केले होते. तसेच सोनल प्रकल्पाची उंची वाढावी या संदर्भात माजी आमदार गजाधर राठोड यांनीही प्रश्न उचलला होता. भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेवरून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मिळाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.