शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मध्यम प्रकल्पांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रखडला!

By admin | Updated: December 31, 2014 01:09 IST

उंची वाढल्यास पाणीटंचाई होणार दूर : सिंचनाचीही होणार व्यवस्था.

नंदकिशोर नारे / वाशिम:  जिल्हय़ात तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी एकबुर्जी व अडाण या प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असून, लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा केला; मात्र सदर प्रस्ताव रखडलेले आहेत. या प्रकल्पांची उंची वाढविल्यास बर्‍याच अंशी पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न निकाली लागू शकतो. वाशिम जिल्हय़ात एकही मोठा प्रकल्प नाही. तीन मध्यम प्रकल्प असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, मालेगाव तालुक्यातील सोनल व कारंजा तालुक्यातील अडाण या प्रकल्पाचा समावेश आहे. यासह १00 लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला एकबुर्जी धरणामधून पाणीपुरवठा केल्या जातो; परंतु एकबुर्जी धरणाची उंची कमी असल्याकारणाने शहराला आवश्यक व मुलबक पाणीपुरवठा होत नाही. धरणाच्या कमी उंचीमुळे शेतीच्या सिंचनाकरितासुद्धा आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. एकबुर्जी उंची वाढविण्याची मागणी शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सदर धरणाची उंची वाढल्यास शहरातील पाणी समस्या तर दूर होईलच शिवाय शेतकर्‍यांना सिंचानाकरिता व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील उद्योगांना पाणीपुरवठा होऊन मागासलेल्या जिल्हय़ाच्या विकासास चालना मिळेल. तसेच कारंजा तालुक्यातील अडाण धरणाची उंची वाढण्यासंदर्भात जनतेची बर्‍याच दिवसांची मागणी आहे; मात्र ही मागणीही अनेक दिवसांपासून रखडलेली आहे. अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यामध्ये असला तरी या प्रकल्पातील पाण्याचा लाभ शेजारील तालुक्याला होतो. प्रकल्पाशेजारी असलेल्या २२ गावांमधील लोकांची लिफ्ट एरिगेशनला चालना मिळण्याकरिता या प्रकल्पाचीही वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. सदरच्या प्रकल्पाची उंची वाढवासी व लिफ्ट एरिगेशनच फायदा शेजारच्या तालुक्यासह या तालुक्यातील २२ गावांमधील लोकांना मिळावा याकरिता खा. भावना गवळी यांनी धरणाच्या भिंतीवर आंदोलन केले होते. तसेच सोनल प्रकल्पाची उंची वाढावी या संदर्भात माजी आमदार गजाधर राठोड यांनीही प्रश्न उचलला होता. भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेवरून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मिळाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.