शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मध्यम प्रकल्पांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रखडला!

By admin | Updated: December 31, 2014 01:09 IST

उंची वाढल्यास पाणीटंचाई होणार दूर : सिंचनाचीही होणार व्यवस्था.

नंदकिशोर नारे / वाशिम:  जिल्हय़ात तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी एकबुर्जी व अडाण या प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असून, लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा केला; मात्र सदर प्रस्ताव रखडलेले आहेत. या प्रकल्पांची उंची वाढविल्यास बर्‍याच अंशी पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न निकाली लागू शकतो. वाशिम जिल्हय़ात एकही मोठा प्रकल्प नाही. तीन मध्यम प्रकल्प असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, मालेगाव तालुक्यातील सोनल व कारंजा तालुक्यातील अडाण या प्रकल्पाचा समावेश आहे. यासह १00 लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला एकबुर्जी धरणामधून पाणीपुरवठा केल्या जातो; परंतु एकबुर्जी धरणाची उंची कमी असल्याकारणाने शहराला आवश्यक व मुलबक पाणीपुरवठा होत नाही. धरणाच्या कमी उंचीमुळे शेतीच्या सिंचनाकरितासुद्धा आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. एकबुर्जी उंची वाढविण्याची मागणी शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सदर धरणाची उंची वाढल्यास शहरातील पाणी समस्या तर दूर होईलच शिवाय शेतकर्‍यांना सिंचानाकरिता व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील उद्योगांना पाणीपुरवठा होऊन मागासलेल्या जिल्हय़ाच्या विकासास चालना मिळेल. तसेच कारंजा तालुक्यातील अडाण धरणाची उंची वाढण्यासंदर्भात जनतेची बर्‍याच दिवसांची मागणी आहे; मात्र ही मागणीही अनेक दिवसांपासून रखडलेली आहे. अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यामध्ये असला तरी या प्रकल्पातील पाण्याचा लाभ शेजारील तालुक्याला होतो. प्रकल्पाशेजारी असलेल्या २२ गावांमधील लोकांची लिफ्ट एरिगेशनला चालना मिळण्याकरिता या प्रकल्पाचीही वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. सदरच्या प्रकल्पाची उंची वाढवासी व लिफ्ट एरिगेशनच फायदा शेजारच्या तालुक्यासह या तालुक्यातील २२ गावांमधील लोकांना मिळावा याकरिता खा. भावना गवळी यांनी धरणाच्या भिंतीवर आंदोलन केले होते. तसेच सोनल प्रकल्पाची उंची वाढावी या संदर्भात माजी आमदार गजाधर राठोड यांनीही प्रश्न उचलला होता. भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेवरून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मिळाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.