शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:19 IST

प्रस्तावांची पडताळणी संथगतीने होत असल्याने अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया प्रलंबितच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागांतील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतींकडून अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंदर्भात प्रस्ताव मागविले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी तालुकास्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत; परंतु या प्रस्तावांची पडताळणी संथगतीने होत असल्याने अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया प्रलंबितच आहे.राज्यातील ज्या गावांत शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण करून राहणाºया ज्या कुटुंबाला ग्रामपंचायतीच्या हद्दीत निवास व्यवस्था नाही व जे लाभार्थी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेंतर्गत पात्र ठरतील, अशा घरकूल पात्र कुटुंबांना भूखंड किंवा मोकळ्या जागेचे वाटप विनामुल्य करण्यात येणार आहे. त्या कुटुंबाच्या काही सदस्यांच्या नावे त्याच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात घर असेल, असे कुटूंब १ जानेवारी २००० पूर्वीपासून अतिक्रमण करून राहत असेल, तर प्रचलित दर विवरणपत्रानुसार येणाºया किमतीप्रमाणे आणि जर १ जानेवारी २००० नंतर; परंतु १ जानेवारी २०११ पर्यंत अतिक्रमण करून राहत असतील, तर प्रचलित दर विवरण पत्रानुसार येणाºया किमतीच्या दीडपट शुल्क आकारून पर्यायी जागेचे वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून याबाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाºयांकडे सादर करावा लागणार आहे.  या अंतर्गत तालुकास्तरावर काही ग्रामपंचायतींनी अहवाल सादरही केले आहेत. आता ग्रामपंचायतींच्या अहवालाची पडताळणी प्रक्रिया करण्यात येत असून, ही प्रकिया संथगतीने सुरू असल्याने अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबितच आहे.

टॅग्स :washimवाशिम