शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

ग्राहक हित जोपासण्यास प्राधान्य!

By admin | Updated: January 1, 2017 01:15 IST

ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा करण्यात येत असल्याची अरुण देशपांडे यांची माहिती.

वाशिम: ग्राहकाचे हित जोपासण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य असून त्यादृष्टीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला सेवा हमी कायदा ग्राहकांच्या हिताचा असून यामुळे विविध शासकीय सेवा वेळेत मिळणे शक्य झाल्याचे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय) अरुण देशपांडे यांनी व्यक्त केले.स्थानिक जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात ३१ डिसेंबरला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्राहक हित जोपासण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. ग्राहकांशी संबंधित शासकीय विभागांचे प्रमुख व ग्राहकांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रत्येक महिन्याला होते. त्यात ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. जिल्हास्तरावरील या महत्त्वाच्या बैठकीला सर्व संबंधित विभागांच्या सक्षम अधिकार्‍यांनी उपस्थित राहणे आवश्यक असून तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी तातडीने निकाली निघण्यास मदत होईल. राज्य शासनाने ग्राहक धोरण निश्‍चित करण्याचे ठरविले असून असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस जिल्हा पुरवठा अधिकारी खंडागळे उपस्थित होते. 'ऑनलाइन शॉपिंग'बाबत लवकरच ठोस धोरणसध्या ह्यऑनलाइन शॉपिंगह्णचे प्रमाण वाढत आहे. या माध्यमातून फसवणूक झाल्यास अथवा या सेवेबद्दल कुणाकडे दाद मागायची, याविषयी ग्राहक संभ्रमात असतात. अनेक वेळा ह्यऑनलाइन शॉपिंगह्णची सुविधा पुरविणार्‍या कंपन्या आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे ह्यऑनलाइन शॉपिंगह्ण करणार्‍या ग्राहकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.