शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य!

By admin | Updated: May 7, 2016 01:17 IST

जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही; पैनगंगा नदीवरील जुमडा बॅरेजच्या कामाची पाहणी.

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून, या प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ग्वाही, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिलीे. पैनगंगा नदीवर वाशिम जिल्ह्यातील जुमडा येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजच्या क्षेत्रीय भेटीप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चक्रधर गोटे, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, अमरावतीचे विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता संजय घाणेकर, वाशिम पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अजय कोहीरकर, माजी आमदार विजयराव जाधव, भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष राजू पाटील राजे, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम ना. महाजन यांनी जुमडा बॅरेजची पाहणी केली. ना. महाजन म्हणाले की, शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून, त्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या ११ बॅरेजचे काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले होते. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ११ बॅरेजेसला सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या या ११ बॅरेजमध्ये सुमारे ३३. २६३ दलघमी पाणी साठा होणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर असे ७ हजार ६९0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे; तसेच दोन्ही जिल्ह्यातील ४७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा ना. महाजन यांनी केला. या सर्व बॅरेजमध्ये निर्माण होणार्‍या पाणी साठय़ाचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी येथील शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना तातडीने वीज जोडण्या देण्याबाबत आपण स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ना. गिरीष महाजन यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले की, वाशिम जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी रिसोड तालुक्यातही पैनगंगा नदीवर बॅरेज उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे; तसेच एकबुर्जी धरणाची उंची वाढविण्याची मागणी यावेळी आ. पाटणी यांनी केली.