शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

विशेष घटक योजनेच्या ११३ लाभार्थ्यांंची वीज जोडणी रखडली

By admin | Updated: January 25, 2016 02:11 IST

२0११-१२ मध्ये शेतक-यांची मोफत कृषी पंप जोडणी योजनेत झाली होती निवड.

कारंजा (जि. वाशिम): दीर्घ कालावधीनंतरही कारंजा तालुक्यातील विशेष घटक योजनेच्या ११३ लाभार्थी शेतकर्‍यांना कृषी पंप जोडणी मिळाली नाही. २0११-१२ मध्ये या शेतकर्‍यांची मोफत कृषी पंप जोडणी योजनेत निवड झाली होती. बिलाच्या थकीत रकमेपोटी तातडीने कृषी पंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कृषी पंप जोडणी देण्यात तेवढी तत्पर नसल्याचा प्रत्यय कारंजा तालुक्यातील शेतकर्‍यांना येत आहे. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्‍या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विशेष घटक योजनेच्या विविध उपक्रमांतर्गत घेतलेल्या विहिरींवर कृषी पंप बसविणे आणि वीज जोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि जिल्हा नियोजन विकास समितीमधून निधीची तरतूद करण्यात आली. २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षात कारंजा तालुक्यातील ३४२ लाभार्थ्यांंंची मोफत कृषी पंप जोडणीसाठी निवड झाली होती. यापैकी नऊ लाभार्थ्यांंंनी यापूर्वीच वीज जोडणी घेतल्याने ३३३ लाभार्थ्यांंंना वीज जोडणी मिळणे अपेक्षित आहे. डिसेंबरअखेर २२0 लाभार्थ्यांंंना वीज जोडणी मिळाली असून, ११३ लाभार्थ्यांंंना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपयांप्रमाणे शासनाने एप्रिल ते मे २0१२ मध्ये अध्र्यापेक्षा अधिक वीज जोडणीचे शुल्क वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले. उर्वरित शुल्काची तरतूद जिल्हा नियोजन विकास समितीमधून करण्यात आली; मात्र चार वर्षे लोटल्यानंतरही ११३ शेतकर्‍यांची कृषी पंप जोडणी पूर्णत्वाकडे गेली नाही. ११३ कृषी पंप जोडण्या रखडल्याने या शेतकर्‍यांना सिंचन करण्यापासून वंचित राहावे लागले.