शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

‘लाल्या’मुळे कपाशी उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:21 IST

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाकडून पिकांची पाहणी सुरु झाली आहे. कृषी विभागाने शेतकºयांना नुकसानापासून वाचविण्यासाठी योग्य  मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्हयात गतवर्षी कपाशीवर बोंडअळींचा मोठया प्रमाणात प्रादूर्भाव झाल्याने शेतकºयांनी यंदा या पिकाकडे पाठ फिरविल्याचे यावर्षी झालेल्या पेºयावरुन दिसून येते. गतवर्षी ३१ हजार हेक्टरवर असलेले कपाशीचे क्षेत्र यंदा १८ हजार ६०० हेक्टरपर्यंत मर्यादित झाले आहे. कृषी विभागाने यंदा कपाशीला बोंडअळीपासून वाचविण्यासाठी पेरणी काळापासूनच शेतकºयांना मार्गदर्शन केले.  तरी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भव झाला आणि कपाशीचे पीक यंदाही हातचे जाण्याची भिती वाढली होती. दरम्यान आॅगस्टमध्ये जोरदार पाऊस आल्याने या किडीला अटकाव झाला. परंतु परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने कपाशी पिक संकटात सापडले. कोरडवाहू शेतजमिनीला तडा पडू लागल्या दिवसाच्या आणि रात्रीच्या वातावरणात विषमता निर्माण झाली. आणि मुळाव्दारे घटकद्रव्ये शोषण्याची कपाशीची क्षमता कमी होत गेल्याने  या पिकावर आता लाल्याचा प्रकोप होत असल्याचे चित्र आहे. कपाशीच्या पेरणीला दीड महिना झाला असून आता पुढे पुन्हा एवढाच कालावधी या पिकाला लाल्या रोगाचा धोका कायम राहणार आहे.  त्यातच हलक्याप्रतिच्या शेतजमिनीवरील कपाशीत या रोगाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगाचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.

वातावरणातील बदलामुळे कपाशीवर लाल्याचा प्रादूर्भाव होत आहे. या पृष्ठभूमिवर कृषी विभागाने कपाशीची पाहणी सुरु केली असून या रोगावर नियंत्रणासाठी शेतकºयांनी दोन ओळींच्या अंतराने पाणी द्यावे, तसेच नत्राचे प्रमाण कमी झाल्याचे वाटत असल्यास ते वाढविण्याचा प्रयतन करावा आणि एक टक्का मॅग्नेशिअम सल्फेट व दोन टक्के डिएपीची पिकावर फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाचेवतिने करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूसagricultureशेती