शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी आवश्यक - प्रा.हरिभाऊ क्षीरसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:58 IST

 ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे.

वाशिम  : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.हरिभाऊ क्षीरसागर हे गांधीवादी म्हणुन ओळखले जातात. एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, गोरक्षणाचे कार्याध्यक्ष, सर्वोदयाचे जिल्हाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष अशा विविध भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद...

- समाजसेवेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली ? विद्यार्थी दशेत असतांना गो.से. महाविद्यालय वर्धा येथे डॉ. ठाकुरदासजी बंग यांच्या मार्गदर्शनामुळे समाजोपयोगी कार्याची ओळख झाली. त्यातुनच पू. विनोदबाजी भावे यांचाही सहवास लाभला. तव्दतच राजस्थान आर्य महाविद्यालयात नोकरीवर असताना नापुर विद्यापिठाचे माजी कुलगुुरु दादासाहेब काळमेघ यांच्याकडून समाजसेवेचा वसा मिळाला.

- आपल्या विविध उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा ?सन १९७२ ला एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन, समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणुन वाशिमची पहिली इंग्रजी शाळा सुरु केली. नागपुर आणि अमरावती विद्यापिठाचा रासेयो समन्वयक म्हणुन विदर्भभर विविध उपक्रम राबवता आले. दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातुन मागील १५ वर्षापासुन गोरक्षणाचे कार्य सुरु आहे. सवंगडयांसमवेत, मोक्षधामाचे काम करतो. विदर्भ साहित्य संघाचा शाखाध्यक्ष म्हणुन विविध साहित्य विषयक उपक्रम वर्षभर चालु असतात. मी गांधीवादी असल्याने सर्वोदय मंडळामार्फत गांधी विचार समाजात पेरण्याचे कार्य करतो. गांधीजीची दीडशेवी जयंती रचनात्मक, उपक्रमांनी जिल्हयात यावर्षी साजरी करायची आहे. सर्व सेवा संघाने भुदान यज्ञ मंडळावर नियुक्ती केली आहे.

- तुम्ही सुरु केलेल्या ‘हरि’ व्याख्यानमालेबद्दल काय सांगाल ?समाज प्रबोधनाच्या हेतुने सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतून हरि व्याख्यानमाला सुरु केली आहे. पुढील वर्षी हरी व्याख्यानमालेला आता वीस वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंत महाराष्ट्रातील सुपरिचीत व्याख्याते येथे येऊन गेले आहेत. य व्याख्यानमालेला प्रतिष्ठा लाभत असुन श्रोते तिची दरवर्षी वाट पाहतात.

- आजच्या तरुण पिढीला कोणता संदेश द्याल ? ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे. आज युवकांमध्ये नकारात्मक वाढीस लागली असुन रड्या लोकांची संख्या वाढत आहे. युवकांनी यापासुन अलिप्त असावे, असे वाटते.ाा शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत