शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी आवश्यक - प्रा.हरिभाऊ क्षीरसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:58 IST

 ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे.

वाशिम  : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.हरिभाऊ क्षीरसागर हे गांधीवादी म्हणुन ओळखले जातात. एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, गोरक्षणाचे कार्याध्यक्ष, सर्वोदयाचे जिल्हाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष अशा विविध भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद...

- समाजसेवेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली ? विद्यार्थी दशेत असतांना गो.से. महाविद्यालय वर्धा येथे डॉ. ठाकुरदासजी बंग यांच्या मार्गदर्शनामुळे समाजोपयोगी कार्याची ओळख झाली. त्यातुनच पू. विनोदबाजी भावे यांचाही सहवास लाभला. तव्दतच राजस्थान आर्य महाविद्यालयात नोकरीवर असताना नापुर विद्यापिठाचे माजी कुलगुुरु दादासाहेब काळमेघ यांच्याकडून समाजसेवेचा वसा मिळाला.

- आपल्या विविध उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा ?सन १९७२ ला एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन, समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणुन वाशिमची पहिली इंग्रजी शाळा सुरु केली. नागपुर आणि अमरावती विद्यापिठाचा रासेयो समन्वयक म्हणुन विदर्भभर विविध उपक्रम राबवता आले. दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातुन मागील १५ वर्षापासुन गोरक्षणाचे कार्य सुरु आहे. सवंगडयांसमवेत, मोक्षधामाचे काम करतो. विदर्भ साहित्य संघाचा शाखाध्यक्ष म्हणुन विविध साहित्य विषयक उपक्रम वर्षभर चालु असतात. मी गांधीवादी असल्याने सर्वोदय मंडळामार्फत गांधी विचार समाजात पेरण्याचे कार्य करतो. गांधीजीची दीडशेवी जयंती रचनात्मक, उपक्रमांनी जिल्हयात यावर्षी साजरी करायची आहे. सर्व सेवा संघाने भुदान यज्ञ मंडळावर नियुक्ती केली आहे.

- तुम्ही सुरु केलेल्या ‘हरि’ व्याख्यानमालेबद्दल काय सांगाल ?समाज प्रबोधनाच्या हेतुने सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतून हरि व्याख्यानमाला सुरु केली आहे. पुढील वर्षी हरी व्याख्यानमालेला आता वीस वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंत महाराष्ट्रातील सुपरिचीत व्याख्याते येथे येऊन गेले आहेत. य व्याख्यानमालेला प्रतिष्ठा लाभत असुन श्रोते तिची दरवर्षी वाट पाहतात.

- आजच्या तरुण पिढीला कोणता संदेश द्याल ? ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे. आज युवकांमध्ये नकारात्मक वाढीस लागली असुन रड्या लोकांची संख्या वाढत आहे. युवकांनी यापासुन अलिप्त असावे, असे वाटते.ाा शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत